अहमदनगर दि.१५ ऑगस्ट
सावेडी उपनगर मधील रावसाहेब पटवर्धन हॅाल येथे स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने ओनली एन्जोय ग्रुप,आणि सुप्रभात ग्रुप यांचा संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप, जेष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा,जेष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, उद्योजक अनिल वाबळे ,अभिजित खोसे,सनी आहुजा,सुप्रभात ग्रुपचे अजय आकडे, ओनली ऐन्जोय ग्रुपचे सावन छाब्रिया ,शेट्टी साहेब माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर ,विजय म्हस्के, दिपक येरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला.
रक्तदान ही काळाची गरज असून तरुणांमध्ये रक्तदान करण्याबाबत जागृती होणे गरजेचे आहे अनेक वेळा रक्त न मिळाल्याने अनेक रुग्णांना अडचणी निर्माण होतात मध्यंतरीच्या कोरोना काळातही रक्तदान शिबिर बंद असल्याने अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे रक्तदान शिबिर भरून रक्त संकलित करणे हे काळाची गरज आहे त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून सावेडी उपनगरातील ओन्ली एन्जॉय ग्रुप आणि सुप्रभात ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या या अखंड रक्तदान शिबिर भरवण्याच्या उपक्रमाचे आमदार संग्राम जगताप यांनी कौतुक केल.
ओन्ली एन्जॉय आणि सुप्रभात ग्रुपच्या सर्व सभासदांसह दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या अनेक रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केलं.