Homeजिल्हाघरबसल्या रद्द करा आपल्या वाहनावरील कर्जाचा बोजा एआरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही...

घरबसल्या रद्द करा आपल्या वाहनावरील कर्जाचा बोजा एआरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही नागरीकांनी सेवेचा लाभ घ्यावा – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार

advertisement

अहमदनगर दि.२५ नोव्हेंबर

आधार क्रमांकाद्वारे आरटीओ कार्यलयात न जाता घरबसल्या सुविधेचा वापर करून आता आपल्या वाहनावरील बोजा रद्द करता येणार आहे. एजंट गाठण्याची गरज नाही, कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही. या लोकाभिमुख सेवेचा नागरिकांनी लाभ घेणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारच्या १६ सप्टेंबर २०२२ च्या अधिसूचनेमध्ये ५८ सेवा आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस पद्धतीने देण्यास मान्यता दिलेली आहे. यात कर्ज बोजा रद्द करणे या सेवेचा समावेश आहे. यामुळे एजंटांकडून होणारी पिळवणूक तर टळेलच; पण वाहनमालकांना कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची देखील आवश्यकता भासणार नाही. यातून वेळेसह पैशाची बचत होईल,

नमुना ३५ व इतर कागदपत्रे अपलोड करावी लागणार अर्जदारामार्फत नमुना ३५ व इतर कागदपत्रे अपलोड केली जाणार आहेत. आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज केल्यास अर्जदारास मूळ नोंदणी प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात येण्याची
आवश्यकता नाही.

दोन दिवसांत अर्ज निघणार निकाली
फेसलस पद्धतीने प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी
करून दोन दिवसांत ते निकाली काढण्यात येणार
आहेत. यामुळे नागरिकांची एजंटांकडून होणारी लूटदेखील टळणार आहे.

आरटीओच्या या सेवाही मिळतात ऑनलाईन
फेसलेस सुविधेद्वारे एआरटीओ कार्यालयातील विविध प्रकारच्या डझनभर सेवाचा लाभ नागरिकांना घेता येऊ शकतो.यात वाहन चालविण्याचा परवाना, परवाना नूतनीकरण, आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना काढणे, वाहनाची नोंदणी करणे आदी सेवांचा समावेश आहे.

ऑनलाईन अर्ज कसा कराल?
या सुविधेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आधार क्रमांकावरील मोबाइलवर ओटीपी पाठविला जाईल. या ओटीपीची नोंदणी केल्यावर वाहनमालकाचे नाव व कार्यालयीन अभिलेख्यावरील नाव यांची खातरजमा केली जाईल. त्यानंतर बँकेमार्फत वाहनावरील बोजा रद्द केला जाईल,

सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा
फैसलेस पद्धतीने नागरिकांना यापूर्वीच विविध प्रकारच्या सेवा देण्यात येत होत्या. आता वाहनांवरील बोजा रद्द करण्यासाठीही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येईल. हा अतिशय लोकाभिमुख उपक्रम आहे. या सेवेचा
नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन अहमदनगरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केलं आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular