Home Uncategorized जालंधर येथून पाठवले तीस हजार रुपयांचे कपडे नगर मध्ये आल्या पार्सल मध्ये...

जालंधर येथून पाठवले तीस हजार रुपयांचे कपडे नगर मध्ये आल्या पार्सल मध्ये फक्त चिंध्या अहमदनगरच्या उद्योजकाला बसला तीस हजार रुपयांचा फटका भारतीय डाक विभाग कडून आलेल्या पार्सल मध्ये कपड्यांऐवजी मिळाल्या चिंध्या

अहमदनगर १ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील एका व्यापाऱ्याने (businessman)आपल्या नातेवाईकाकडून पंजाब राज्यातील जालंधर ( jalndher) येथून काही किमती कपडे(cloth) मागवले होते.दोन बॉक्स मध्ये हे कपडे पोस्ट ऑफिस (post office) मार्फत पार्सल द्वारे टाकण्यात आल्यानंतर अहमदनगर शहरातील सावेडी पोस्ट ऑफिस (post office) मधून कपिल गोयल हे जालंधर वरून आलेले दोन्ही बॉक्स घरी घेऊन गेले असता बॉक्स (box) उघडल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका बॉक्स मध्ये पाठवलेले कपडे (cloth) होते तर दुसऱ्या बॉक्स मध्ये फाटलेले जुने कपडे लहान मुलांचे(littelchiled) जुने कपडे(old cloth) आणि चिंध्या( rags)आढळून आल्या. त्यामुळे कपिल गोयल यांना मोठा धक्का बसला या प्रकारानंतर त्यांनी थेट सावेडी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या प्रकाराबाबत माहिती दिली.

मात्र येथील पार्सल (parsel) देताना ते पूर्ण पॅक बंद होते त्यामुळे पुढची जबाबदारी आमच्यावर राहत नाही असे उत्तर दिले गेले. त्यामुळे पियुष गोयल यांना चांगलाच मनस्ताप झाला. त्यानंतर माजी नगरसेवक निखिल वारे यांनी सावेडी पोस्ट ऑफिस मध्ये येऊन या प्रकरणाबाबत पोस्ट अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर अखेर त्यांनी याबाबत आम्ही वरिष्ठांना लेखी कळवू तसेच पियुष गोयल यांच्याकडून त्याबाबतचा लेखी तक्रारी अर्ज लिहून घेतला . भारतीय डाक विभागावर करोड लोकांचा विश्वास आहे. मात्र काही ठिकाणी पार्सल उतरवण्यासाठी आणि भरण्यासाठी खाजगी कॉन्ट्रॅक्टदार मार्फत कर्मचारी भरले जातात त्यामुळे अशा ठिकाणी काही आदलाबद्दल होऊ शकते. मात्र याचा ठपका भारतीय डाक विभागावर जाऊन लोकांचा विश्वास भारतीय डाक विभागावरून उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पार्सल( parcel)उतरवले जातात आणि भरले जातात, ठेवले जातात अशा ठिकाणी सीसीटीव्ही(cc tv) लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे निखिल वारे यांनी सांगितल आहे. याबाबत त्यांनी भारतीय डाक विभागाकडे तक्रार केली असून तसेच खासदार सुजय विखे यांच्याकडेही या प्रकरणाबाबत तक्रार केली असल्याचं निखिल वारे यांनी सांगितले.

मात्र हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून असे प्रकार जर वाढत गेले तर भारतीय डाक विभागावरचा विश्वास उडू शकतो त्यामुळे भारतीय डाक विभागाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत आणि या चोरीचा तपास लावावा अशी मागणी पियुष गोयल यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version