मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) थेट जनतेशी संवाद साधला. शिवसेनेत एवढं मोठ बंड झाल्यावर मुख्यमंत्री काय बोलणार? तसेच कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. यावेळी उद्धव ठाकरे ही एखादी मोठी घोषणा करणार म्हणून सर्व राज्य या फेसबुक संवादाकडे लक्ष लागले होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की , कोणताही अनुभव नसताना मी प्रशासकीय व्यवस्था सांभाळत होतो त्यानंतर कोरोना आला सर्वांच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळण्यात आला.
मी कोणाला भेटत नाही हा मुद्दा बरोबर आहे मात्र मी आजारी होतो त्याबद्दल मी आता काही बोलू शकत नाही मी ऑनलाईन सर्वांशी भेटत होतो
हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे हिंदुत्वाबद्दल विधीमंडळात बोलणारा मी पहिला नेता असेल मात्र काही जण असे भासवण्याचा प्रयत्न करतात की ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारा पासून दूर चालली आहे.2014च्या बिकट परिस्थिती नंतरही 64 आमदार याच शिवसेनेने निवडून आणले होते.
शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांचे आता फोन येत आहेत जबरदस्तीने नेल्याचा दावा गेलेल्या आमदारांनी केला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री पद स्वीकारले जर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी मला मुख्यमंत्री पद नको असं बोलले असते तर मला काही वाटलं नसतं मात्र माझ्या लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं. सुरतला जाऊन हे बोलायची गरज नव्हती त्यांनी माझ्या समोर येऊन बोलले असते तर मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.
मी राजीनामा पत्र तयार करून ठेवतो पवारांनी माझ्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना द्यावे मी शिवसेनापक्षप्रमुख पद ही सोडायला तयार आहे मात्र माझ्या समोर येऊन माझ्या शिवसैनिकांनी हे सांगायला पाहिजे.