अहमदनगर दि.९ नोव्हेंबर –
प्रभाग क्रमांक ८ मधील गांधीनगर येथील नागरिक समस्यांच्या विळख्यात अडकले आहेत ड्रेनेज, सांडपाणी,रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशी विविध समस्यांना तोंड देत आहेत ड्रेनेज व सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याचबरोबर रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट झाली असल्यामुळे आमच्या मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी स्कूल बस येत नाही याचबरोबर गॅस टाकी ची गाडी ही येत नाही गांधीनगर परिसरामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक वास्तव्यास आहे तरीसुद्धा आम्ही महानगरपालिकेकडे फेज टू पाणी योजनेचे कनेक्शन घेण्यासाठी पैसेही भरले आहेत तसेच नियमित करही भरतो तरीसुद्धा पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही यासाठी गांधीनगर येथील रहिवाशांनी दवंडी द्वारे आयुक्त साहेब आपल्या दारी येत आहे हो… असे सांगितले जात होते तरी आयुक्तांनी लक्ष घालून या भागातील नागरी समस्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी यावेळी केली आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील गांधीनगर परिसरातील विविध नागरी समस्यांची पाहणी सभापती कुमारसिंह वाकळे व आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केली.यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, गांधीनगर भागातील मूलभूत प्रश्न मी नगरसेवक असताना सोडविले होते आता मी नगरसेवक नाही पण माझी या नागरिकांशी नाते जोडलेले आहे यांचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे यासाठी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी या भागाची पाहणी केली आहे. लवकरच विकास कामांचे अंदाजपत्रक बनविले जातील व टप्प्याटप्प्याने प्रश्न मार्गी लावू जर लवकरात लवकर मनपा प्रशासनाने मूलभूत प्रश्न मार्गी लावली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा ईशारा त्यांनी दिला.
यावेळी शहर अभियंता सुरेश इतापे म्हणाले की, सभापती कुमार सिंह वाकळे व आयुक्त पंकज जावळे यांनी गांधीनगर परिसरातील समस्याची पाहणी केली आहे ड्रेनेज व सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी भुयारी अमृत गटार, भेज टू योजना लवकरात मंजूर होणार आहेत सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रस्त्याच्या कामांसाठीही अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे टप्प्याटप्प्याने ही सर्व कामे मार्गी लावू असे ते म्हणाले.