अहमदनगर दि.२ नोव्हेंबर
अहमदनगर शहराच्या असणाऱ्या भिंगार परिसरातील लष्करी हद्दी जवळ बांधकाम करावयाचे असल्यास लष्कराचा ना हरकत दाखला प्रांत कार्यालयामध्ये सादर करण्यासाठी बनावट दाखला तयार करून तो प्रांत कार्यालयात सादर केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात महसूल विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिस तपासात लष्करामधील एक क्लार्क तसेच एका सेवानिवृत्त कर्मचारी आणि एक खाजगी इसमास पोलिसांनी अटक केली होती. मात्र या प्रकरणात दोन वर्षापासून पाठपुरावा करणारे शाकीर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे फौजदारी याचिका दाखल करून या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांच्याकडे असलेले दस्तऐवज आणि त्यांचा जबाब नोंदवून घेण्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते.
मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे तपसी अधिकारी डी वाय एस पी अनिल कातकडे यांनी उच्च न्यायालयाचे आदेशाचा अनुपालन करुन शाकीर शेख यांच्याकडे असलेले दस्तावेज तसेच पुरावे आणि जबाब नोंदवून घेतलेले नाहीत. तसेच तपासी अधिकारी हे योग्य रित्या तपास करीत नाही. मुळ आरोपींना पाठीशी घालत आहेत. सदरचा गुन्हा हा देशाच्या सुरक्षा शी निगडीत असताना गुन्हयाची व्यप्ती मोठया प्रमाणात असताना सखोल तपास होऊन सदर गुन्हयात कोण कोण आरोपी आहे याचा शोध घेऊन योग्यरित्या तपास करणे आवश्यक असताना त्या पध्दतीने होत नाही. आरोपींना पुरावे नष्ट करण्याचे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. फक्त तीन बनावट NOC च्या अनुषंगाने तपास होत आहे. व त्यामध्ये ही संबधीत भुखंडधारक व संरक्षण विभागातील इतर कर्मचारी यांना पाठीशी घालण्यात आलेले आहे त्यांच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे न्यायालयाचे आदेशाचे अनुपालन करून संबंधीत तपास अधिकारी यास माझे जवाब नोंदवुन घेण्यास दिरंगाई केल्याबाबत त्यांना जाब विचारण्यात यावा व त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी जर सदर गुन्हयाचा सखोल तपास होऊन मुळ आरोपीन विरोधात कारवाई व्हावी असे आपल्याला वाटत असेल सदर गुन्हयाचा तपास CBI किंवा IPS अधिकारी कडे वर्ग करण्यात यावा अशा मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी नाशिक परीक्षेचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.