मुंबई दि.२९ मे
राज्यसभा निवडणुकी साठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढत चालली आहे. आतापर्यंत तीन राजकीय पक्षांकडून पाच उमेदवरांची घोषणा करण्यात आली होती. तर एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे आत्ताची स्थिती पाहता राज्यसभेचा कोटा पूर्ण होताना दिसत होता.
मात्र भाजप या निवडणुकीत आणखी रंगत आणत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजप या निवडणुकीत आणखी एक उमेदवार उतरवला आहे. भाजपने कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर असा सामना आता रंगवला आहे. कोल्हापुरातले भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आणकी रंगतदार झाली आहे.