अहमदनगर दि.१८ ऑक्टोबर
महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी मोर्चे आंदोलने सभा जोरात सुरू आहेत. प्रत्येक समाज आपल्या मागण्यांसाठी आंदोलन आणि उपोषण करत आहे मराठा मराठा समाज न्हावी समाज ओबीसी आदिवासी मुस्लिम धनगर असे सर्व समाज सध्या रस्त्यावर उतरून आरक्षण मिळावं या मागणी करता आंदोलन करत असताना अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक आणि भाजपचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि समाजातील प्रत्येक घटकांना नेहमीच मदत करणारे साई सेवा ट्रस्टचे सर्वा सर्वे धनंजय जाधव यांनी ओबीसी आरक्षण नाकारणार असल्याचे म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाची ज्याला गरज नाही त्यांच्या आरक्षण काढून मराठा समाजातील गरजू व्यक्तींना आरक्षण द्यावे अशी वेगळी मागणी भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी केली आहे आज राज्यामध्ये आरक्षणावरून जो वाद सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री महसूल मंत्री यांना पत्र पाठवणार असल्याचे देखील जाधव यांनी म्हटले मराठा समाजातील दुर्बल घटकांना आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी देखील जाधव यांनी यावेळी केली केली असून एक वेगळा आदर्श त्यांनी प्रत्येक समाजासमोर ठेवला आहे जे नेते अनेक वर्षांपासून मंत्रीपदाची खुर्ची सांभाळत आहे आणि इतर समाजाविषयी गरळ ओकणाऱ्या नेत्यांना धनंजय जाधव यांनी एक मोठी चपराक लगवली आहे.
एकीकडे अनेक राजकीय नेते दोन समाजांमध्ये वाद लावण्याचे काम सध्या करत असल्यास चित्र महाराष्ट्र मध्ये दिसून येत आहे. मात्र अहमदनगर शहरातील धनंजय जाधव यांनी या नेत्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे आणि या आदर्षावर महाराष्ट्रातील नेते चालू लागले तर निश्चित महाराष्ट्रात सर्वाच जाती-धर्माचे लोक एकत्र आणि आनंदाने लागू लागतील आणि हा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटू शकेल.
.