अहिल्यानगर दिनांक २८ जून
‘जय हरी विठ्ठल’ चा नामघोष करत वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात श्री भैरवनाथ महाराजांच्या पायी दिंडीने आज २८ जून रोजी बनपिंपरीवरून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. या पालखी सोहळ्यामध्ये बनपिंपरी गावासह आसपासच्या परिसरातील वारकरी भाविक सामील झाले असून वारीची वर्षानुवर्षांची परंपरा यावर्षी देखील तितक्याच प्रसन्न वातावरणात पुढे जाताना दिसत आहेत.
बलभीमराव विठोबा जगताप ,माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांची चौथी पिढी या पायी दिंडीमध्ये सहभागी झाली असून जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि गुणे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन अरुणकाका जगताप यांचे चिरंजीव आराध्य सचिन जगताप हा सलग तिसऱ्या वर्षी पायी दिंडीमध्ये सहभागी झाला आहे. स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या आधीच्या पिढीपासूनच दिंडीची परंपरा सुरू होती. ती परंपरा आता जगताप यांच्या चौथ्या पिढीनेही सुरू ठेवली असून वयाच्या दहाव्या वर्षीपासूनच आराध्य हा पायी दिंडीमध्ये सहभागी झाला होता. यावर्षी त्याचे तिसरे वर्ष असून हातात भगवा झेंडा डोक्यावर वारकऱ्यांची टोपी आणि विठू नामाचे गजर करत पाई पाई आराध्य इतर वारकऱ्यांसह दिंडीमध्ये सहभागी होऊन पंढरपूर कडे रवाना झाला आहे.
बनपिंपरी वरून आज ही दिंडी सकाळी पंढरपूरकडे रवाना झाली प्राध्यापक माणिक विधाते यांनी या दिंडीला शुभेच्छा दिल्या तर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे,मयूर कुलथे अंकुश मोहिते, समीर भिंगरदिवे,सिद्धार्थ आढाव, मनेश साठे, संतोष ढाकणे,खैरे, निखिल लुने, योगेश दाणी आदीसह बनपिंपरी पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.