अहमदनगर दि.२२ मे
आजकाल सार्वजनिक उत्सव साजरे करणे हे सध्या एक मोठे फॅशन झाली आहे. ठिकठीकाणी चौकाचौकात मोठे बॅनर डीजे भव्य मंडप उभारले जातात आणि दिवसभर त्यावर गाणे वाजवले जातात. पूर्वीच्या काळात मोठ्या सार्वजनिक उत्सव जनजागृती साठी चालू करण्यात आले हिते आजकाल राजकीय ताकत दाखवण्यासाठी होत असतात. पूर्वी या सार्वजनिक उत्सवातून मागील इतिहास पुढच्या पिढीला माहिती व्हावा त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले योगदान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सर्वजण एकत्र येऊन हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सव साजरे करण्यातचा हेतू आधीच्या काळात होता.
मात्र जग जसजसे पुढे जाऊ लागली तसतसे या सार्वजनिक उत्सवाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. पूर्वीच्या काळात दिवसभर महापुरुषांच्या यशोगाथा चे गाणे लाऊड स्पीकर ऐकू येत होते मात्र आता “आवाज वाढव डीजे तुला आईची शपत आहे”अशा गाण्यावर तरुणाई थिरकत असते. उत्सव साजरे होतात तेव्हा भलेमोठे बॅनर त्या ठिकाणी लावले जातात त्यावर हवशे गावशे नावशे तरुणांचे फोटो आणि स्वतःचाच जय-जयकार जास्त केलेला दिसून येतो.
सरकारी कार्यालयात अनेक सरकारी अधिकाऱ्यांना सार्वजनिक उत्सव आले की डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढत असते. अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांचे फोन या काळात खन खनू लागतात आणि वर्गणीसाठी मागणी होऊ लागते. वेळप्रसंगी दमही दिला जातो त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी हैराण होऊन जातात पैसे दिले नाही तर फोनवर फोन किंवा कार्यकर्त्यांच्या चकरा सरकारी कार्यालयात वाढत जातात. जोपर्यंत काहीतरी वर्गणी पदरात पडत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते पिच्छा सोडत नाही ही वस्तुस्थिती आहे.
दरवर्षी ही संख्या वाढत चालली असून त्यामुळे सरकारी कार्यालयातील अधिकारी वैतागून गेले आहेत. वर्गणीला कोणाचीच ना नसते मात्र वर्गणीची रक्कम अव्वाच्यासव्वा असल्यामुळे अधिकारी कंटाळून जातात आणि अनेक कार्यकर्ते येत असल्यामुळे कोणाकोणाला वर्गणी द्यायची हा प्रश्न अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पडतो. हा प्रकार कुठेतरी थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बरं या चक्रात फक्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश नाही तर मोठे व्यावसायिक आणि डॉक्टर ,बांधकाम व्यवसायिक यांचाही समावेश असतो. मात्र त्यासाठी खऱ्या अर्थाने आणि सदभवानेने जयंती उत्सव साजरी करणे हे महत्त्वाचे आहे.
अशा चुकीच्या प्रकारांमुळे जे कार्यकर्ते खरंच आपल्या खिशातले पैसे घालून आणि समाजासाठी काही करण्याचा प्रयत्न करतअसतो त्या कार्यकर्त्यांना सुद्धा या वर्गणी मागणाऱ्या चुकीच्या लोकांमुळे नाहक बदनामी आणि त्रास होत असतो काही चुकीच्या लोकांमुळे अनेकांना या गोष्टीचा त्रास जाणवतो.