अहमदनगर दि.१८ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील बडी मरियम मस्जिद ते राजकोट चाळ या रहिवासी भागात गेल्या
दोन वर्षापासुन पाणी पुरवठा नियमितपणे होत नसून यामुळे नागरिकांच्या पाण्यावाचून हाल होत आहेत याबाबत स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन पाणी प्रश्ना बाबत लक्ष वेधले आहे.
मुकुंदनगर मधील बडी मरियम मरियम मस्जिद ते राजकोट चाळ या भागात गेली दोन वर्षापासुन नियमितपणे पाणी सोडणारा पाणी सोडत नाही. पाणी पुरवठा हा सहा ते सात दिवसानंतर केला जातो. पाणी सोडणारे कर्मचाऱ्यास विचारणा केली असता अहमदनगर महानगरपालीकेचा तसा आदेश असल्याबाबत सदर कर्मचारी सांगतो. त्या करीता काही नागरीकांनी या बाबात मनपा प्रशासनास चौकशी केली असता वार्ड नं. ३ मुकुंदनगर या विभागासाठी दिवस-आड पाणी सोडण्याचे आपले आदेश असल्याबाबतची माहीती मिळाली मात्र त्यानंत रपाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यास पाणी निदान दोन दिवस आड तरी सोडणेबाबत विनंती केली असता तो पुन्हा मला आदेश नसल्याने मी सहा ते सात दिवसानंतर पाणी सोडणार असे उत्तर देत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे पाण्यामुळे हाल होत आहेत. संपुर्ण शहराला एक न्याय आणि या भागात राहणाऱ्या नागरिकांना वेगळा न्याय का असा सवाल या भागातील नागरीक करत आहेत.
मनपा प्रशासनाचा आदेश असतानाही दोन दिवसात पाणी न सोडता सहा ते सात दिवसांनी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मधल्या काळातील पाणी हे दुसरीकडे कुठेतरी वळवले जात असून आमच्या परिसरातील पाण्याची चोरी होत असल्याची खात्री असल्यामुळे या प्रकाराबाबत चौकशी करावी अशी मागणी ही या भागातील नागरिकांनी केली आहे.
या पाण्याच्या प्रश्नाबाबत मनपा प्रशासन ने तातडीने योग्य ती कारवाई करावी अन्यथा पुढील काळात महानगरपालिकेत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या भागातील नागरिकांनी मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.