औरंगाबाद दि.२६ एप्रिल
एकीकडे राज्यात मशिदीवरील भोंगे असो किंवा हनुमान चालीसा असो यावरून राजकारण तापलेले असताना त्यांतच औरंगाबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ते आदित्य दहीवाल मित्रमंडळाच्या वतीने लावण्यात आलेले व जातीय सलोखा निर्माण करणारे होर्डिंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दहीवाळ मित्र मंडळाच्या वतीने लावण्यात आलेल्या या हिर्डिग वर ” दोस्ताना कम से कम इतना बरकरार रखो की..मजहब बीच में न आये.! कभी तुम उसे मंदिर तक छोड दो, कभी वो तुम्हे मस्जित छोड आये.!! अशा आशयाचे मजकूर असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. नागरिक ही या होर्डिंगचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून हे फोटो सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.