Home राजकारण महाविकास आघाडीत बिघाडी काँग्रेस पक्षाला जागा सोडली नसल्याने काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वासाठी आता...

महाविकास आघाडीत बिघाडी काँग्रेस पक्षाला जागा सोडली नसल्याने काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वासाठी आता मैत्रीपूर्ण लढतीस तयार – मंगल भुजबळ

अहिल्यानगर दिनांक 26 ऑक्टोबर

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या विरोधात महा विकास आघाडीचे अभिषेक कळमकर अशी लढत रंगणार आहे.


नगर शहर मतदार संघावर काँग्रेस पक्षांनी ही दावा केला होता अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा विधानसभेपैकी कर्जत,जामखेड, श्रीगोंदा, नगर शहर काँग्रेसने मागितले होते मात्र महाविकास आघाडीत नगर दक्षिण मध्ये काँग्रेसला एकही जागा न
सुटल्याने एकप्रकारे नगर दक्षिण मधील काँग्रेसचे अस्तित्व संपवण्याचा मित्रपक्ष्याकडून प्रयत्न होतं आहे स्वतः राहुलजी गांधी साहेब यांनी कालच्या दिल्ली येथील मीटिंग मध्ये ओबीसी उमेदवार दया म्हणून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना सूचना केलेल्या असताना आपल्याला उमेदवारी डावलण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांचे नाव डावण्यात आले असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे.

जाणीवपूर्वक नगर शहरातील जागा मित्र पक्षाने
काँग्रेसला सोडली नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वासाठीआपण नगर शहरातुन निवडणूक लढवणार असल्याचं मंगल भुजबळ यांनी जाहीर केल आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश घेऊन सोमवारी मंगल भुजबळ अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे जर मंगल भुजबळ यांनी अर्ज मागे घेतला नाही तर मैत्रीपूर्ण लढतही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version