अहमदनगर दि.१५ एप्रिल
गुरुवारी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात साजरी झाली मात्र रात्रीच्या घटनेने शेवटच्या क्षणी या उत्सवाला गालबोट लागले मात्र याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सायंकाळच्या दरम्यान मिरवणूक निघणार त्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी अर्ज अनेक मंडळांनी आधीच दिले होते. तसेच प्रशासनाने रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक काढण्याची परवानगी दिले असल्याने रात्रीच्या वेळेस मिरवणूक मार्गावर भारनियमन होणार नाही यासाठी वीज वितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते. तर रस्त्यावरील लाईट बाबत महानगर पालिका विद्युत विभागाने लक्ष ठेवणे गरजेचे असताना गुरुवारी निघालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मार्गावर अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते.त्यामुळे या अंधाराचा आणि गर्दीचा फायदा घेऊन काही टवाळखोर तरुणांनी गोंधळ घातला ही सत्य परिस्थिती आहे.
महावितरण कंपनीने मिरवणूक मार्ग लक्षात ठेवून या मार्गावरील भारनियमन तात्पुरते थांबवणे गरजेचे होते मात्र तसे न करता मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी भारनियमन असल्याने रस्त्यावरील खांबावरील सर्व लाईट बंद होते त्यामुळे अंधाराचे साम्राज्य होते .
मिरवणुकीत सामील झालेल्या मंडळांच्या डीजे सिस्टीम वर जनरेटर साह्याने लावलेल्या लाईटवरच ही मिरवणूक सुरू होती ही वस्तुस्थिती आहे मग जर गुरुवारी रात्री एखादी मोठी घटना या अंधाराचा फायदा घेऊन घडली असती तर याला जबाबदार कोण महावितरण कंपनी का महानगरपालिका असा सवाल आता उपस्थित होतोय.
एवढी मोठी मिरणुक असतानाही आणि त्याची पूर्वकल्पना असूनही विद्युत वितरण कंपनीने आणि महानगरपालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा होता मात्र तो केला गेला नसल्याचं कालच्या घटनेवरून लक्षात येत आहे. जर उद्या एखादी मोठी दंगल उसळली असती तर किंवा जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण महावितरण कंपनी का महानगरपालिका?
पोलिसांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली त्यांच्या तातडीच्या कारवाई मुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आलं मात्र या अंधाराचा फायदा घेऊन अनेक जण फरार झाले पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्यामुळे मोठी घटना घडली नाही मात्र अंधारच फायदा घेऊन कदाचित एखादी मोठी घटना घडली असती तर याला जबाबदार वीज वितरण कंपनीचे राहिली असती.