अहमदनगर दि.२० सप्टेंबर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची सत्ता उलटून लावली होती त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली तर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात माळ पडली.तेव्हा पासून राज्यात शिवसेनेच्याएकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट या दोन गटात ताकद दाखवण्यासाठी चांगलीच स्पर्धा लागलेली आहे. शिवसेनेत सध्या उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटाकडे जाण्यासाठी मोठी रीघ लागलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी सध्या राज्यवृत्तवर करून आपल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी विविध ठिकाणी मेळावे घेत आहेत.
खा. राहुल शेवाळे,उत्पादन शुल्क मंत्री शंभू राजे देसाई ,आमदार अनिल बाबर, खा,सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत नगर शहरात उद्या 21 सप्टेंबर बुधवारी मोठा मेळावा होणार असून या मेळाव्यात एकनाथ शिंदे गट आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न करणार असून सेनेत दोन गट झाल्या पासून पहिल्यांदाच हा मेळावा होत आहे. नगर शहरातील काही आजी माजी नगरसेवक तसेच भिंगार छावणी मंडळाचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
खा. राहुल शेवाळे मंत्री शंभू राजे देसाई ,आमदार अनिल बाबर, यांच्या उपस्थितीत प्रथम शासकीय विश्रामगृह येथून बाईक रॅली निघणार आहे शाहरतील प्रमुख मार्गावर ही रॅली जाणार आहे माळीवडा बसस्थानक जावळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली नक्षत्र लॉन कडे जाणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाप्रमुख अनिल शिंदे,शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव, भिंगारशहर प्रमुख सुनील लालबेंद्रे,उपजिल्हाप्रमुख पै.सुभाष लोंढे,काका शेळके, आणि शिंदे गटाचे पदाधिकारी करत आहेत.