मुंबईः दि .७ सप्टेंबर
राज्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat election) कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. येत्या ऑक्टोबर महित्यात 18 जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसाठी निवडणुका( election ) होतील. यंदा थेट जनतेतून सरपंच (directly in Sarpanch ) पदाची निवडणूक होणार असून या निवडणुकांबाबत राज्यातील ( state )जनतेला मोठी उत्सुकता आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी होईल.थेट सरपंचपदांसह 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर प्रथमच एवढी मोठी सार्वजनिक निवडणूक होत आहे. त्यामुळे आता सत्ता बदल झाल्यानंतर ग्रामीण भागात मतदारांचा कौल कोणाला असणार याचे उत्तर या निवडणुकीतून मिळू शकेल.