अहमदनगर दि. ९ जून
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अंबिका नगर च्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रथमच आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. हनुमान चालीसा पठण स्पर्धा या स्पर्धेत नगर जिल्ह्यातील जवळपास ५५ स्पर्धकांनी भाग घेतला यामध्ये १९ सामूहिक पठाण आणि ३६ व्यक्तिगत स्पर्धकांनी हनुमान चालीसा पठण केले .या स्पर्धेत दोन फेऱ्या मधून निकाल काढण्यात आला यावेळी मुख्य परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय प्रख्यात गायक सूरदास पवन नाईक यांनी काम पाहत मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रथमतः आज होणाऱ्या या स्पर्धेबाबत जनमानसात हनुमानाची प्रभू श्रीरामचंद्रांप्रती असलेली भक्ती म्हणजेच गुरु आणि शिष्य चा धडा या हनुमान चालीसा मधून घ्यावा असे प्रतिपादन पवन नाईक यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक अंबिकानगर चे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत धर्माच्या प्रति समर्पणाचा भाव तयार व्हावा पर्यायाने तो जोपासला जावा या भावनेने ही स्पर्धा घेण्यात आल्याचे सांगत हनुमंताच्या नामस्मरणामधे काय ताकद आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच हनुमान चालीसा आहे , हनुमान चालीसा चे प्रतिदिन आपण पठाण करून धर्माला व गुरू-शिष्याच्या नात्याला जोपासणे खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन केले याच बरोबर या कार्यक्रमाचे आयोजन केल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या हिंदूत्ववादी संघटनेच्या लोकांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधून या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत उत्सुकता दाखवली आणि आता अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या माध्यमातून होणार असल्याचा अभिमान आहे असे सुमित वर्मा यांनी सांगितले.
विशेष सहभाग –
स्पर्धेत वय वर्षे ४ असलेला चि.जयदीप दिपक कार्ले आणि वय वर्षे ५ असलेला चि.प्रियांश श्रीनिवास येनगूल या चिमुकल्यांच्या सहभागाने कार्यक्रमात कमालीची रंगत आली होती आणि कौतुकास्पद बाब म्हणजे संपूर्ण हनुमान चालीसा या चिमुकल्यांना तोंडपाठ होती . या साठी आयोजकांनी यांचा विशेष सत्कार केला तसेच महिलांचा सहभाग देखील प्रशंसनीय होता.
विदेशी पाहुण्यांची भेट –
इराण आणि अमेरिकेतील ३ महिला भारतीय संस्कृती चा सर्वेक्षण करण्यासाठी नगरच्या प्रसिद्ध अवतार मेहेराबाद या ठिकाणी आले असता त्यांना या स्पर्धेची माहिती मिळाली आणि उत्सुकतेपोटी कार्यक्रमास्थळी उपस्थित राहुन बऱ्याच दिवसांपासुन करत असलेल्या सर्वेक्षणातुन मिळालेल्या अनुभवावरून भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म हा जगातील सर्वात सुरक्षित असल्याचे अभिमानास्पद उद्गार काढले तेव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
सुरदास श्री पवन नाईक सर यांच्या हस्ते आणि विदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली . या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पठाण यामधील गटामध्ये प्रथम क्रमांक श्री घनश्याम अविनाश बियाणी , द्वितीय क्रमांक श्री.अजय मिश्रा , तृतीय क्रमांक श्री.पंकज धर्माधिकारी, तसेच सामूहिक पठाणा मध्ये प्रथम क्रमांक श्री.शिव गोरक्ष सत्संग मंडळ , द्वितीय क्रमांक काला हनुमान सत्संग मंडळ , तृतीय क्रमांक विर हनुमान सत्संग मंडळ यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये स्वयंभू प्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुरंग काळे यांनी सूत्रसंचालन करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष संकेत जर यांनी आभार मानत विद्यार्थी सेनेच्या वतीने नेहमीच धार्मीक उपक्रमाची मेजवानी नगरकरांच्या समोर आणण्याचा प्रयत्न असेल असे जाहीर केले यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड , उपशहर अध्यक्ष स्वप्निल वाघ , ओंकार काळे , अनिकेत शियाळ , अनिकेत जाधव , मनिष मेढे , अमोल भालसिंग , विजय पुंड व महाराष्ट्र सैनिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.