अहमदनगर दि.९ जून
टेबला खालून देऊ नका घेऊ नका असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने वारंवार आवहान करूनही लाच घेण्याचे प्रकार थांबत तर नाहीच उलट वाढत चाललेत आहेत.त्यात पोलीस दल पुढे आहे नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यात लाच घेण्यावर नाशिक जिल्हा आघाडी वर असून त्या खालोखाल अहमदनगर धुळे, जळगाव, नंदूरबार,या जिल्ह्यांच्या पोलिसांचा नंबर लागतो.
नाशिक परीक्षेत्रात पाच जिल्हे येतात या मध्ये लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये नाशिक जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून अव्वल स्थान टिकवून आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत झालेल्या १० लाचखोरीच्या प्रकरणांत एकट्या नाशकात ५ लाचखोर गजाआड झाले. त्यापाठोपाठ अहमदनगर, धुळ्याचा नंबर लागतो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कंबर कसून कारवाई
करत असताना दुसरीकडे संपूर्ण राज्यभरातच लाचखोरीची पाळेमुळे खोलवर रुजत असल्याचे दिसून येत आहेत.
गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये लाचखोरीसंदर्भातील तक्रारींसाठी ५६ वेळा सापळे रचावे लागले, यात ३६ लाचखोरांना गजाआड करण्यात आलं यात एकट्या नाशिकच्याच १२ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.यानंतर अहमदनगरमध्ये ६ धुळ्यात चार, तर जळगावमध्ये ३ आणि नंदूरबारमध्ये २ लाचखोर ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर २०२२ मध्ये झालेल्या कारवायांकडे पाहिल्यास निम्मे वर्ष
सरत नाही तोच १० लाचखोर जेल मध्ये गेले
एकूण आकडेवारी अशी :
नाशिक : ४०,नगर ३५,धुळे १४,जळगाव ३३,नंदूरबार ७
२०२१ – २०२२ (मेपर्यंत) नाशिक – सापळे -३६
पकडले- १०, धुळे सापळे – ४ पकडले -२ जळगाव सापळे – ३ पकडले – १ अहमदनगर सापळे- ६ पकडले – २ नंदुरबार सापळे- २ पकडले – ००