HomeUncategorizedकार डेकोरेशन थेट रस्त्यावर झोपडी कॅन्टीन ते पत्रकार चौक कार डेकोरेशन थेट...

कार डेकोरेशन थेट रस्त्यावर झोपडी कॅन्टीन ते पत्रकार चौक कार डेकोरेशन थेट महामार्गावरच… महापालिका आणि शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष ! एखादी मोठी घटना झाल्यावर कारवाई होणार का?

advertisement

अहमदनगर दि.१५ जुलै

अहमदनगर शहरातील महामार्ग असतील किंवा शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते असतील या सर्व रस्त्यांवर दुकानदार अतिक्रमण करून रस्ता विकत घेतल्यासारखे वागत असतात. कापड बाजारातील पथ विक्रेत्यांचा वाद अनेक वेळा समोर आला मात्र नगर शहरात अतिक्रमण ठिकठिकाणी आहेत. चौपटी करंजावरील दत्त मंदिरासमोरील खाद्यपदार्थांच्या गाड्या हे जागा विकत घेतल्याप्रमाणे लावल्या जातात चितळे रोड असेल किंवा दिल्ली गेट परिसर या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहून खाद्य पदार्थ विकतात या ठिकाणी आलेले ग्राहक त्या गाड्यांसमोर आपल्या दुचाकी वाहने लावून उरलेल्या रस्त्यात इतर नागरिकांना ये जा करावी लागते त्यामुळे जीव मुठीत घेऊन नगरकर प्रवास करतात. या जागा अधिकृत या लोकांना भाड्याने दिल्या का याचा खुलासा ही आता नगरपालिकेने करावा कारण मनपा याकडे दुर्लक्ष का करते? महिन्यातून कधीतरी अतिक्रमण विभागाची गाडी फिरते मात्र ती गाडी पुढे गेल्यानंतर अतिक्रमण जैसे थे होते हे आता सांगण्याची गरज नाही.

या अतिक्रमणाप्रमाणेच नगर शहरातील कार डेकोर करणारे अनेक दुकाने नव्याने उघडली गेली आहेत या सर्व दुकानदार थेट शहरातील महत्त्वाच्या महामार्गावरच सजावटीसाठी आलेल्या गाड्या रस्त्यावर उभ्या करूनच गाडीचं डेकोरेशन करत असतात शहर वाहतूक शाखेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर मनमाड रोडवरील पत्रकार चौक ते झोपडी कॅन्टीन पर्यंत चक्कर मारली तर सर्व गाड्या रस्त्यावर उभ्या राहूनच डेकोरेशन केल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळते. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होती आणि अपघातही होतात मात्र याचं घेणं देणं या दुकानदार चालकांना कधीच नसतं महानगरपालिकेप्रमाणे शहर वाहतूक शाखा यांच्याबाबत मावळ धोरण का स्वीकारते हा एक मोठा प्रश्न आहे डोळ्याने दिसणारी वाहतूक कोंडी शहर वाहतूक पोलिसांना दिसत नसेल का? असा प्रश्नही समोर येतोय.

झोपडी कॅन्टीन परिसरातील कार डेकोर असेल तिथून तेथेच पत्रकार चौकापर्यंत पाच सहा दुकाने आपली कार डेकोरेशन थेट रस्त्यावर करत आहेत हे शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेला दिसत नसेल का असा प्रश्न आता नगरकरांना पडला आहे.

महापालिका असो अथवा शहर वाहतूक शाखा असो दोन्ही ठिकाणी नेहमी कर्मचारी कमी असल्याची तक्रार ऐकायला मिळते मात्र ज्या गोष्टी वाहतूक शाखेचा एक पोलिसही जाऊन करू शकतो त्या ठिकाणी महानगरपालिका आणि पोलिसांनी जाणे गरजेचे आहे. कारण नगर मनमाड हा मोठ्या वाहतुकीचा महामार्ग असून एखादी मोठी घटना या ठिकाणी घडू शकते त्यामुळे महानगरपालिकेसह शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular