पुणे दि.२७ जुलै
जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील नाना पेठेत घडली आहे. या तरुणा वर अवघ्या 30 सेकंदात कोयत्याने 35 वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील समर्थ नगर पोलीस स्टेशन हद्दीततील नाना वाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. अक्षय वल्लाळ असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो सामाजिक कार्यकर्ता ( आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी नाना पेठ परिसरातील नवावाडा परिसरात राहतात. मयत अक्षय वल्लाळ हा त्याच परिसरात राहतो. अक्षय वल्लाळ हा नानापेठ परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर होता. समाजात त्याची चांगली ओळख होती.
https://youtu.be/gkrSjrMKkBw
काही कारणावरून आरोपी आणि मयत तरुण यांच्यात भांडण झाले होते. यामुळे आरोपींचा अक्षयवर राग होता. दरम्यान सोमवारी मध्यरात्री अक्षय हा नानावाडा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या अक्षय याच्यावर प्राण घातक हल्ला केला. इतकेच नाही तर तो निश्चित पडल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात देखील वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.