कोल्हापूर दि. १६ एप्रिल
गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर उत्तर मतदारसंघाने राजकारणाचा पारा वाढवला होता. आज त्यात मतदारसंघाचा निकाल लागला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे सत्यजीत कदम अशा होणाऱ्या या निवडणुकीत दोन नेत्यांची प्रतीष्ठ पणाला लागली होती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही जागा भाजपच्या गोटात यावी यासाठी पूर्ण जोर लावला होता तर दुसरीकडून कोल्हापूर उत्तरचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी सतेज पाटील प्रयत्न करत होते.
मात्र कोल्हापूर उत्तर मतदार संघातील मतदारांनी भाजपला नाकारत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या जयश्री जधाव यांच्या बाजूने कौल दिला आहे.
26 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 88338 मत तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 71813 मिळावी होती मातांची आकडेवारी आणि मोजणी करण्यात येणारे मतदान पाहता जयश्री जाधव यांचा विजय निश्चित मानले जात असल्याने कार्यकर्त्यांनी बॅनर सह फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशावर ठेका धरला आहे.
राजाराम तलावा शेजारील शासकीय गोदामात ही मतमोजणी पार पडली अगदी पहिल्या फेरी पासूनच जायश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती ती आघाडी कायम ठेवत अखेर भाजपच्या सत्यजित कदम यांना पराभवाची धूळ चारली आहे.