दिल्ली दि.४ ऑगस्ट
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आता पुढील सुनावणी 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.
बुधवारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली. आजच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी झाली
तूर्तास पक्षाच्या चिन्ह बाबत निर्णय घेऊ नये, प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार का नाही यावर सोमवारी सूनवणी होणार, राजकीय पक्षाला दुर्लक्षित करता येणार नाही हे लोकशाहीसाठी घातक असे मत आहे न्यायालयाने मांडले आहे. त्यामुळे आता 8 ऑगस्ट रोजी नेमकं काय होणार याकडेच सर्व राज्याचे लक्ष लागले आहे मात्र आता या परिस्थितीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का नाही याबाबतही प्रश्नचिन्ह असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विरोधी पक्षाने जोरदार टीका केलीय तर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.