अहमदनगर दि.,३१ ऑक्टोबर
मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने आज अहमदनगर शहरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजता माळीवाडा एस्टी स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते दिल्लीगेटमार्गे छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारका पर्यंत हा मशाल मोर्चा निघणार आहे.
सकल मराठा अहमदनगर तर्फे 30 ऑक्टोबर पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी गोरख दळवी,संतोष आजबे,नवनाथ काळे,अमोल हुंबे हे चार कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांचा दुसरा दिवस आहे तर बीडमध्ये शांततेच्या आंदोलनाला आता चांगलेच हिंसक वळण लागले असून बीड मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर काल रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल बैस यांची भेट घेतली आहे त्यामुळे आज क मराठा आरक्षणावर तोडगा निघू शकतो अशी शक्यता असून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मराठा समाजाच्या वतीने माळीवाडा एसटी स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दिल्ली गेट मार्ग चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पर्यंत हा मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे तरी मराठा समाजातील सर्वच बंधू-भगिनींनी या मशाल मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.