औरंगाबाद दि.२६ एप्रिल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या महाराष्ट्र दिनी होऊ घातलेली जाहीर सभा ठरल्याप्रमाणेच होणार आहे. यात कोणताही बदल होणार नाही, असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं. औरंगाबादमधील सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नसली तरीही काही दिवसात परवानगी मिळेल, राज ठाकरेंची सभा दणक्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद येथील राज ठाकरे यांची सभा ठरल्याप्रमाणे होईल. आमचे सगळे पदाधिकारी २८ एप्रिलपासूनच औरंगाबादला जाणार आहेत. औरंगाबादमध्ये शांतता भंग करणं किंवा लॉ-ऑर्डर पालन न करणं, असं काही होणार नाही… आमची सभा अत्यंत शांततेत पार पडेल, असं वक्तव्य नितीन सरदेसाई यांनी केलं. औरंगाबादची सभा आणि आयोध्या दौरा यांच्या नियोजनासाठी आमचे सगळे पदाधिकारी कामाला लागलेत. आम्ही नकारात्मक विचार घेऊन पुढे जात नाही. सभेला परवानगी नक्कीच मिळेल, अशी आशा नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केली.।