Home शहर पारिजात चौकातील पत्र्याच्या शेडवर करवाई करून छेडछाड करणाऱ्या परप्रांतीय लोकांना हटवा…

पारिजात चौकातील पत्र्याच्या शेडवर करवाई करून छेडछाड करणाऱ्या परप्रांतीय लोकांना हटवा…

अहिल्यानगर दि. .24 जानेवारी

नगर शहरातील विविध भागातील हॉटेलसह रस्त्यांवर विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांवर उघडे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह असून अन्न व औषध विभागासह महापालिका आणि इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नगर शहराची आणि उपनगर लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे.त्याचप्रमाणे विविध ठिकाणी बिर्याणी बनवून विकणारे अनेक दुकाने उघडण्यात आले आहेत.या बिर्याणी विक्री करणाऱ्या व्यवसायिकांकडे खरंच परवाने आहेत का ? आणि परवानगी असल्यानंतर या ठिकाणी सर्व स्वच्छतेचे निकष पाळले जातात का? हेही पाहणे गरजेचे आहे. अनेक परप्रांतीय लोक नगर मध्ये येऊन बिर्याणी हाऊस उघडून व्यवसाय करत आहेत. मात्र त्यांच्याकडून स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याचा अनेक ठिकाणी डोळ्याने दिसून येतेय.

नगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये असलेल्या गुलमोहर रोड परिसरातील पारिजात चौक या उच्चभ्रू परिसरात बिर्याणी चे दुकान थाटले गेले असून या ठिकाणी कोणतेही स्वच्छतेचे निकष पाळले जात नाही. तसेच या चौकात मोठ्या प्रमाणात पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी या दुकानांना मोठ्या प्रमाणात आगही लागली होती या ठिकाणी परप्रांतीय नागरिकांनी आपली दुकाने थाटली असून या परप्रांतीय लोकांकडून परिसरातील महिलांना छेडछाडीचे प्रकारही घडल्यामुळे ही दुकाने काढून अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी आता समोर येऊ लागली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version