अहमदनगर दि.३० जून
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचीत केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ (G.S.R.571 (E) नुसार ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वस्तू वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. ०१ जुलै २०२२ पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक वस्तू वापरावर बंदी घालण्यात येणार आहे.
तर दि. १ जुलै २०२२ पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक वस्तू वापरावर बंदी घालण्यात आली असून तसेच सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल), मिठाई बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेट पाकिटे याची प्लास्टिक आवरणे, प्लास्टीकच्या काडयासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काडया, प्लास्टिकचे झेंडे, कँडी काडया, आईसक्रीम कांडया,प्लास्टिक प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स) तसेच १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी आहे. याबरोबर, महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल.
अधिसूचना २०१८ अंतर्गत खालील गोष्टी प्रतिबंधीत आहेत. वरील वस्तूवर शासनाने बंदी घातलेली आहे
कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग्स)
हॅण्डल असलेल्या व नसलेल्या प्लास्टिक डिश, बाउल, कन्टेनर (डबे) तरी वरील साहित्याचा वापर, वाहतूक किंवा साठवणूक करु नये अन्यथा महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) नियम २०१६ अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ चे उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे दंड आकारण्यात येईल असे अहमदनगर महानगरपालिकेनी शहरातील हद्यीतील सर्व व्यापारी ,दुकाने सर्व नागरिक यांना जाहीर सूचनेद्वारे कळवले आहे.
जर आपण प्लास्टिकचा वापर केला तर होऊ शकतो मोठा दंड
पहिला गुन्हा- रु.५०००/-
दुसरा गुन्हा- रु.१०,०००/-
तिसरा गुन्हा -रु.२५,०००/- व तीन महिन्याचा कारावास