Home जिल्हा कुंपणच शेत खात होते तक्रार कोणाकडे करायची याच विवंचनेत पोलीस कर्मचारी भाऊसाहेब...

कुंपणच शेत खात होते तक्रार कोणाकडे करायची याच विवंचनेत पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी केला आपल्या जीवनाचा शेवट

राहुरी दि.२ ऑक्टोबर

राहुरी येथील मुळा डॅम धरणावर गार्ड नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी सर्व्हिस रायफल मधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या घटने नंतर सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राहुरी येथे धाव घेतली होती भाऊसाहेब आघाव यांनी आत्महत्या का केली याचे कारण आता समोर आले असून त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट चांगलीच व्हायरल झाली आहे.या सुसाईड नोटच्या आधारे राहुरी पोलीस स्टेशन मध्ये प्रेमकुमार भाउसाहेब आघाव यांच्या फिर्यादी वरून सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे,सहह्याक फौजदार प्रकाश निमसे, मपोकॉ राउत सर्व नेमणुक राजुर पोलीस स्टेशन ता अकोले
,शिवाजी फुंदे नेम– पोलीस मुख्यालय अहमदनगर यांच्या विरोधात भादवि कलम 306,385,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव ज्यांच्या आत्महत्येनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून ज्या पोलीस दलाला शिस्तीचे खाते म्हणून ओळखले जाते आणि सर्वसामान्य जनतेसह समाजातील पीडित लोकांना न्याय मिळण्याची जागा म्हणून पोलीस खात्याकडे सर्वजण पाहत असतात मात्र याच पोलीस खात्यातील पोलिसाला न्याय भेटला नाही अशीच परिस्थिती भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्या नंतर समोर आली आहे. कुंपणच जर शेत खात असेल तर तक्रार कोणाकडे करायची अशीच परिस्थिती भाऊसाहेब आघाव यांची झाली होती त्यामुळेच त्यांनी सुसाईड नोट लिहून टोकाचे पाऊल उचलले आहे.

सुसाईड नोट मध्ये लिहलेली परिस्थिती पोलीस दलात खरी आहे का? आणि असेल तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल असाच प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे यांनी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती. तर, त्यात सहायक फौजदार प्रकाश निमसे याने एका पोलीस महिलेला हाताशी धरुण भाऊसाहेब आघाव यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा दाखल करताना सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचाही सहभाग होत. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आघाव यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच या पाच लाखातील तीन लाख रुपये हे गुन्हा दाखल केलेल्या महिलेला देण्याचे ठरले होते. त्यानंतर ही महिला गुन्हा मागे घेणार होती. तर, आघाव यांची नियुक्ती शेंडी येथे असताना त्यांनी त्या परिसरातील अवैध धंदे बंद केले होते. त्यामुळे साबळे यांचे हाप्तेखोरीतून पाच लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे असे एकंदर १० लाख रुपये आघाव यांच्याकडे मागितले होते. तसेच जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यांची विभागीय चौकशी लागली. ती निल करण्यासाठी आरोपी पोलीस कर्मचारी शिवाजी फुंदे याने एक लाख रुपये मागितले होते. एवढी मोठी रक्कम या सर्व लोकांना द्यायची कशी या विवंचनेत पोलीस कर्मचारी आघाव होते. ही सर्व हकीगत त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेली आहे. आणि या सर्वांच्या त्रासामुळेच आपण आत्महत्या करत असल्या त्यांनी नमूद केलं असल्यामुळे पोलीस खात्यातील एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. आपल्या सहकाऱ्याला कसे अडकवायचे आणि त्याच्याकडून पैसे कसे उकळायचे असाच काहीसा प्रकार या घटनेतून समोर आला आहे.

पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट वरून एक गोष्ट सिद्ध होते की त्यांना पद्धतशीरपणे विनयभंगाच्या सापळ्यात अडकवण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्लॅन या सर्वांनी केला होता मात्र भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्या नंतर हे सर्व उघडकीस आले असले पोलीस खात्यांमधील अशा नीच वृत्तीच्या लोकांना धडा मिळालाच पाहिजे कायदा हा सर्वांसाठीच समान असतो त्यामुळे आता यामधील सर्व आरोपींना शिक्षा झाली तरच पोलीस खात्यामधील अशा प्रवृत्तीच्या लोकांवर जरब बसेल अन्यथा पोलीसच सुरक्षित नसेल तर जनता कधी सुरक्षित राहणार

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version