अहमदनगर दि१४ सप्टेंबर
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर, राहुरी या ठिकाणी धर्मांतर आणि लव जिहाद (Love Jihad and Conversion )या प्रकारच्या घटना घडत असून श्रीरामपूर येथील एका आदिवासी मुलाने मुस्लिम तरुणीशी विवाह केल्याने त्याला मारून टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तर त्याआधी मुल्ला कटर या गुंडाने काही मुलींना कुंटनखान्यात विकल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सध्या महाराष्ट्रामध्ये या प्रकरणांमुळे चांगलाच गाजत आहे. राहुरी जिल्ह्यातही मध्यंतरी धर्मांतर प्रकरणी मोठा गदारोळ उडाला होता या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी आज नगर शहरांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या समन्वयक प्रियांका कोरेगावकर,भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा विद्दे, गीता गिल्डा, गीतांजली काळे, अंजली वल्लाकटी, रेखा विधाते, वंदना पंडित, प्रिया जाणावे, मनीषा डावरे,गोरक्षनाथ तांदळे, कुणाल भंडारी, अरुण ठाणगे, संतोष गवळी आदींसह हिंदुराष्ट्र सेना आणि हिंदुत्ववा संघटनांचे (Hindu Janajagruti Samiti, BJP, Hindu Rashtra Sena) प्रतिनिधींनी चौपाटी कारंजा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोर नागरिकांमध्ये जनजागृती(public awareness) व्हावी यासाठी निदर्शने केली.
महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतरण बंदी कायदा तात्काल लागू करावा या मागणीसाठी तसेच नगर जिल्ह्यात घडलेल्या लव्ह जिहाद घटनांचा निषेध करण्यात आला.
यावेळी विविध मान्यवरांनी लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर कायद्याबाबत आपली मते मांडली महाराष्ट्रामध्ये तसेच अहमदनगर जिल्ह्यात वारंवार असे प्रकार होत असून यासाठी पोलिसांनीही गांभीर्याने लक्ष घालून असे प्रकार रोखावेत अशी मागणी यावेळी विविध वक्त्यांनी बोलताना केली आहे. भारत माता की जय, वंदे मातरम ,लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, धर्मांतर बंदी कायदा झालाच पाहिजे ज्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता .