अहमदनगर दि.१६ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील विलास हरीचंद्र झांबरे आणि राजकुमार विक्रम कणसे,( रा. कोकणगांव, ता. कर्जत, जि.अहमदनगर ) यांचे एकमेकांचे ओळखीचे संबंध असल्याने विलास झांबरे यांनी राजकुमार विक्रम कणसे यांना शेतीकामासाठी काही रक्कम लागत होती झांबरे आणि कणसे यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्यामुळे आणि शेती कामासाठी पैसे लागत असल्यामुळे विलास झांबरे यांनी राजकुमार कणसे यांना हात उसने म्हणून तीन लाख रुपयांची सहा महिन्यांच्या मुदतीसाठी रक्कम दिली होती तसेच याबाबत नोटरी पब्लिक यांच्यासमोर कायदेशीर नोटरी करून असतात नोंदविलेल्या प्रमाणे सहा महिन्यांच्या आत पैसे परत देण्याचे कबूल केले होते.
मात्र राजकुमार कणसे यांनी विलास झांबरे यांना ठरलेल्या कराराप्रमाणे पैसे न दिल्याने कणसे यांच्याकडे पैशाची मागणी केल्यानंतर विलास झांबरे यांना राजकुमार कणसे यांनी नगर अर्बन कोप.बँकेचा धनादेश नं. ०१५०७६ विलास झांबरे यांना दिला होता.मात्र बँकेत धनादेश टाकल्या नंतर २७ नोव्हेंबर 2019 रोजी न वटता परत आला. त्यानंतर विलास झांबरे यांनी कणसे यांना दिनांक १३.१२.२०१९ रोजी नोटीस पाठविली. परंतू कणसे यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे विलास झांबरे यांनी राजकुमार कणसे यांच्या विराधात कोर्टात फिर्याद दाखल केली.
या केसमध्ये फिर्यादीचा पुरावा व साक्षीदार तपासल्यानंतर या केसमध्ये मे. ज्युङि मॅजि. नाईकवाडी यांनी आरोपीस दोषी ठरवून आरोपीस चार महिने साधी कैद तसेच फिर्यादीस रुपये ४,००,०००/- नुकसान भरपाई देणेबाबत आदेश केलेला आहे, भरपाई न दिल्यास एक महिन्या साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.या केसमध्ये फिर्यादीचे वतीने ॲङ धैर्यशिल उर्फ अजित लक्ष्मण वाडेकर व ॲङ विक्रम लक्ष्मण वाडेकर, ॲङ अतिश निंबाळकर यांनी काम पाहीले.जिल्हा न्यायालयात प्रथमच एवढया मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईची रक्कमेबाबत निकाल झालेला आहे.