औरंगाबाद दि.२९ एप्रिल
राज ठाकरे यांची सभा किंवा रॅली होऊ नये यासाठी मनाई हुकुम देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली होती. ही याचिका हाय कोर्टाने सुनावणीसाठी घेतली असता पोलीस आयुक्तांचे आदेश कोर्टासमोर सादर करण्यात आले. तसंच सभेबाबत पोलीस आयुक्तांनी सर्व काळजी घेतली असल्याचंही कोर्टाला सरकारी वकिलांनी सांगितलं. त्यानंतर संबंधित याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं हाय कोर्टाने नमूद केलं आणि याचिका कर्त्यांना 1 लाखाचा दंड ठोठावत याचिका फेटाळून लावली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांची सभा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय. ही याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलंय. तसंच याचिकाकर्त्यांना 1 लाखाचा दंडही ठोठावला आहे.