अहमदनगर दि.४ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील सर्वच रस्त्यांची चांगलीच दुरवस्था झाली असून पाऊस बंद होऊन आठवडा झाला मात्र महानगरपालिकेकडून रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम आद्यपही हाती घेण्यात आलेले नाही. या बाबत आता शिवसेना (शिंदे गट) चांगलाच आक्रमक झाला असून आज शहर शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
काही दिवसापासून शहरातील अंतर्गत रस्त्यांची
प्रचंड दुरवस्था आहे. नागरिकांना विविध मणक्याचे कंबरेचे आजार तसेच धुळ उडून श्वसनाचे आजार या सामोरे जावे लागत आहे. शहरात होणारी रस्त्याची तात्पुरती डागडुजीकरण न करता पूर्णपणे नव्याने करण्यात यावे. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मंजुर असलेल्या रस्त्यांसाठी साठी निधीची तातडीने व्यवस्था करावी जेणे करून शहर पेंचिंग करण्याऐवजी शहरातील नवीन रस्ते होतील. रस्ता दुरुस्तीसाठी आलेला निधी योग्य नियोजन व व्यवस्थापन करून शहरासह , सावेडी, केडगाव,बोल्हेगाव,बुरुडगाव रोड भागातील रस्ते दुरुस्ती करावी. रस्त्याची झालेल्या दुरावस्थमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक अपघात होऊन जीवन भर अंपगत्व तसेच काहीनी आपले प्राण गमावले आहेत तरी वरील विषयास गांभीर्याने घेऊन 15 दिवसांत कामे हाती घ्यावीत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ
या वेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवले, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे नगरसेवक मदन आढाव, काका शेळके,तसेच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.