Home Uncategorized झीरो तलाठ्यांवर कारवाई कधी ? सरकारच्या आदेशाला महसूल विभागातील तलाठ्यांकडून केराची टोपली.....

झीरो तलाठ्यांवर कारवाई कधी ? सरकारच्या आदेशाला महसूल विभागातील तलाठ्यांकडून केराची टोपली.. खाजगी लोकच चालवतात तलाठी कार्यालय

Oplus_131072

अहिल्यानगर 31 मे

जिल्ह्यातील तलाठ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आता उपविभागीय अधिकारी (एसडीएम) जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. त्यावर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. तसेच झीरो तलाठ्यांचे वर्चस्व संपुष्टात आणा, त्यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर थेट तलाठ्यांवरच निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला.

असाच प्रकार नगर जिल्ह्यात सुरू असून अनेक ठिकाणी खाजगी लोक तलाठी कार्यालयात काम करताना आढळून येतात या बाबत नुकतीच एक तक्रारा अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.नगर शहरातील सावेडी, नागापूर , नवनगापूर या ठिकाणी खाजगी लोक कामाला ठेवून कामकाज सुरू असल्याचे पुरावे असून ही लोक नागरिकांची आर्थिक पिळवणूक करतात असा आरोप करण्यात आला आहे.

महसूल प्रशासन लाचखोरीमुळे बदनाम होत चालले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी नवीन आलेल्या जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक थांबवण्यासाठी खाजगी लोकांवर करवाई करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

तलाठी कार्यालयात खासगी व्यक्ती काम पाहत असून ते सामान्यांना उद्धटपणे बोलत असतात. तसेच काम करण्यासाठी अव्वाची सव्वा पैसे मागत असतात अशा लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version