Home Uncategorized चहापेक्षा किटली गरम, चार मतं घ्यायची लायकी नाही आशा लोकांमुळे आम्ही उठाव...

चहापेक्षा किटली गरम, चार मतं घ्यायची लायकी नाही आशा लोकांमुळे आम्ही उठाव केला – आ. गुलाबराव पाटील

मुंबई, ४ जुलै

आमची निष्ठा, 35-35 वर्ष आम्ही शिवसेनेत घातली आहे. बाळासाहेब हे आमच्या ह्रदयात राहतील. आम्ही योग्यच केलं आहे, भाजप-शिवसेनेची युती राहणार होती, तेच आम्ही केलं आहे असा विधान शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार गुलाबराव पाटील यांनी आज विधान परिषदेतील भाषणादरम्यान केल आहे.त्यांनी आज अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिल आहे स्वपक्षासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही त्यांनी चांगच सुनावलं.

आम्ही बंड केला नसून उठाव केला आहे. एकनाथ शिंदे सुरतला गेले होते,  ते गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. ‘असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या’, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, असा खुलासाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. तसंच, ‘या चार कंडोळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील  यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

‘तुमची प्रेत बाहेर येईल, तुम्ही डुक्कर आहात, वरळीमधून जाऊ देणार नाही, अशी धमकी देत आहे, पण आम्ही काही लेचेपेचे आमदार नाही. असंच आमदार म्हणून निवडून आलो नाही, असा पलटवारही गुलाबराव पाटलांनी केला.

आम्ही बंड केला नसून उठाव केला आहे. एकनाथ शिंदे सुरतला गेले होते,  ते गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. ‘असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या’, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, असा खुलासाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आदित्य ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. चहापेक्षा किटली गरम, असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला.

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version