अहमदनगर दि.२० जुलै
राज्यात सध्या राजकीय घडामोडी प्रत्येक तासा तासाला बदलत आहेत.त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळते शिवसेना नेमकी कोणाची याबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये फैसला होणार आहे.मात्र अनेक निष्ठावंत सैनिक शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटाकडे जातानाचे चित्र रोजच पाहायला मिळू लागले आहे.
अहमदनगर शहरात तसे पाहिले तर शिवसेना ही बलाढ्य ताकद होती मात्र माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्या निधनानंतर शहरातील शिवसेना खिळखळी झाली आहे. त्यामध्येच राष्ट्रवादीच्या पाठिंबावर शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर अनेक मतप्रवाह समोर आले होते. एकेकाळी नगर शहर आणि शिवसेना एक वेगळे समीकरण होते.
मात्र आता नगर शहरात राष्ट्रवादीची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक अस्वस्थ असून केडगाव हत्याकांड प्रकरणात शिवसेनेने घेतलेली भूमिका आणि त्यानंतर राज्यात झालेल्या महाविकास आघाडीनंतर शिवसेनेने घेतलेली भूमिका याबाबत अनेक-शिवसैनिकांमध्ये नाराजी असतानाच आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीची साथ नको म्हणून बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला अनेक नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला असतानाच नगर शहरात 25 वर्ष अधिराज्य गाजवणारे स्वर्गीय माजी मंत्री अनिल राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून वाघाच्या चीत्रासमोर फोटो काढून त्यावर लवकरच असा मेसेज दिला आहे.त्यामुळे लवकरच काय होणार याची उत्सुकता युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसह शहरातील शिवसैनिकांना लागली आहे. या पोस्ट खाली अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत त्यामुळे आता या पोस्ट चा अर्थ काय आणि ते काय भूमिका घेणार याकडेच नगरवासीयांचे लक्ष लागून आहे.