Home शहर बहुगुणी तुळशीला अध्यात्मिक महत्त्व – अॅड. धनंजय जाधव कार्तिकी एकादशीनिमित्त तुळस...

बहुगुणी तुळशीला अध्यात्मिक महत्त्व – अॅड. धनंजय जाधव कार्तिकी एकादशीनिमित्त तुळस रोपांचे वाटप

अहमदनगर दि.५ नोव्हेंबर –

बहुगुणी तुळशीला अध्यात्मात मानाचे स्थान आहे.याचबरोबर तुळशीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मामुळे आयुर्वेदातही विशेष महत्त्व आहे.असे प्रतिपादन अॅड. धनंजय जाधव यांनी केले.कार्तिकी एकादशीनिमित्त येथील हरिभूमी प्रतिष्ठानच्यावतीने तोफखाना परिसरातील प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदीरात तुळस रोपांची वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

श्री सिध्देश्वर मंदीर हे पाचशे वर्षांचा इतिहास असून हे भाविकांचे श्रद्धा स्थान आहे.तुळशीचे महत्त्व विशद करताना हरीभुमी प्रतिष्ठानचे अभय ललवाणी यांनी सांगितले की,तुळस ही श्रीकृष्ण भगवान यांना अतिशय प्रिय असल्याने तुळशीला कृष्णप्रिया असेही संबोधले जाते.कोरोना महामारीच्या काळात देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन केले जात होते.दररोज 4 तुळशीचे पाने सकाळी खाल्ल्याने मधुमेह, रक्त विकार, वात, पित्त इतर आजार नाहीसे होतात. तुळशीच्या मोहोराला मंजिरी म्हणतात. मंजिऱ्या पाण्यात टाकून ते पाणी पिल्यास पोटाचे विकार, उष्णता दाह कमी होतो. तुळस ही सतत ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने हवा शुद्ध करण्यासाठी व प्रदूषण रोखण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून आज कार्तिकी एकादशीच्या शुभ दिनी तुळस रोपांचे वाटप करण्यात येत असल्याचे अभय ललवाणी यांनी यावेळी सांगितले.

तुळस ही श्रीकृष्ण भगवान यांना अतिशय प्रिय असल्याने तुळशीला कृष्णप्रिया असेही संबोधले जाते.कोरोना महामारीच्या काळात देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात येत होता.यावेळी संजय बोगा, मारुती पांढरे भैय्या बिडकर उमेश उपाध्ये उल्हास नांगरे आदी उपस्थित होते.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version