अहमदनगर दिनांक 6 सप्टेंबर
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात नवरात्री उत्साहाच्या दरम्यान एका सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाच्या समोर 29 सप्टेंबर रोजी रोहित जगधने या बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र हा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. या मुलाचा मृत्यू फिट मुळे झाला असल्याची चर्चा होत असतानाच त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या उघड्या विजेच्य तारांमुळे शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शिनी दिली होती. याबाबत विद्युत मंडळाने या नवरात्र उत्सव मंडळाची तपासणी केली असता या ठिकाणी नवरात्री उत्सवाच्या मंडळा बाहेरच्या लावलेल्या कामानीसाठी अनधिकृत वीज घेतल्याच आढळून आल्यामुळे त्याबाबतचा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.
तर या घटनेनंतर बारा वर्षेय रोहित जगधने याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा आता वैद्यकीय अहवाल आला असून या अहवालात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आल आहे.त्यामुळे आता हा विजेचा शॉक कोणाच्या हलगर्जीपणामुळे लागला आणि या ठिकाणी कोणी अनधिकृत वीज कनेक्शन घेतले होते याबाबत पोलीस सखोल तपास करणार आहे.