अहमदनगर दि.११ ऑक्टोबर
अहमदनगर शहराच्या लगत असणाऱ्या भिंगार कॅम्प परिसरातील लष्करी हद्दीच्या शेजारी बांधकाम करायचे असल्यास लष्कराची बांधकाम परवानगी लागते याकरीता लष्कराच्या आर्मी हेडक्वार्टर मधून त्याची प्रक्रिया करावी लागते असे बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना आणि नागरिकांना सांगण्यात येत असल्यामुळे लष्कराची प्रक्रिया फार किचकट असते त्यामुळे प्रत्येक बिल्डर या कामासाठी खाजगी एजन्सी नेमणूक करून त्याच्या करवी हे काम करून घेत असल्याचं नुकत्याच एका प्रकरणात समोर आले आहे. लष्कराची बनावट एनओसी देऊन लष्करासह महसूल खात्याची फसवणूक केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे त्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
वास्तविक पाहता गेल्या सहा वर्षापासून लष्कराच्या आर्मी हेडक्वार्टर मधून एकही बांधकाम परवाना देण्यात आला नाही. तर 2017 मध्ये आलेल्या एका परिपत्रक नुसार लष्कराच्या रेड आणि यलो झोन बाबतीत लष्कराने जारी केलेल्या भारतातील शहरांमध्ये अहमदनगर शहराचं नावच नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लष्कराच्या भिंतीपासून दहा फुटाच्या अंतरावर बांधकाम करायचे असल्यास परवानगी लागते मात्र दहा फुटाच्या पुढे लष्कराची कोणतेही परवानगी लागत नाही अशी ही माहिती समोर येत आहे.
मात्र याबाबत प्रांत कार्यालय असेल अथवा नगररचना कार्यालय असेल या दोन्ही कार्यालयाकडून लष्करी हद्दीतील बांधकाम धारकांकडून लष्कराची एनओसी आणण्याबाबत सांगितले जात होते. मात्र लष्कराची परवानगी लागत नाही या सर्व गोष्टींची माहिती दोन्ही कार्यालयांना माहिती पाहिजे होती. मात्र जाणून-बुजून अथवा काही हेतूपूर्वक बांधकाम व्यवसायिकांना एनओसी आणण्यात सांगितले जात होते का ? हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. लष्कराची एनओसी लागते हा बागुलबुवा नेमका कोणी उभा केला? तसेच या बागुलबुवाच्या आडून लाखोंची कमाई कोणी केली असे अनेक प्रश्न आता समोर येऊ लागले आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या बनावट एनओसी प्रकरणामध्ये एका एजंटची चौकशी करण्यात आली होती तसेच महसूल खात्यातील एकाची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून या एनओसी प्रकरणांमधून कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याची चर्चा आहे. मग हे करोडो रुपये कोणाच्या खिशात कशाप्रकारे जातात याचा तपास होणे गरजेचे आहे. किती दिवसापासून हा प्रकार सुरू होता तसेच या प्रकारात कोणी कोणी गणेशाचा प्रसाद खाल्ला.अमोल कसा यात सहभागी होता याचा तपास होणेही अत्यंत गरजेचे आहे नागरिकांना एनओसीचा बागलबुवादाखून लाखो करोड रुपये लुटणाऱ्या लोकांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे अन्यथा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन असे लोक भविष्यात पुन्हा उन्माद करू शकतात.