Home शहर जनतेचे रक्षकच भक्षक झालेत” त्या नायब तहसीलदारवर ताबा मारण्याचे गंभीर आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे...

जनतेचे रक्षकच भक्षक झालेत” त्या नायब तहसीलदारवर ताबा मारण्याचे गंभीर आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अहमदनगर दि.७ मे
अहमदनगर शहरातील बलिकाश्रम रोड वरील वाघ मळा या ठिकणी सि स नं – ७३९४/१ हा संपूर्ण सर्वे नंबर कै. सुरेश नामदेव वाघ यांच्या वडिलोपार्जित मालकीचा आहे,त्यातील १०० चौ मी (१गुंठा) मोकळी जागा नायब तहसिलदार ठकसेन बाबुराव ढगे यांनी त्यांच्या आईच्या म्हणजे भिमाबाई बाबुराव ढगे यांच्या नावे खरेदी केली आहे, परंतु नायब तहसिलदार हे त्या जागेत कायम वास्तव्यास आहेत त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून वाघ यांच्याच मालकीची त्याच्या शेजारीच असलेल्या जास्तीच्या २०० चौ फु (२ गुंठे) जागा बळकावुन ताबा मारला आहे, त्यात पक्के RCC बांधकाम व कंपाऊंड बांधले आहे, त्या संदर्भात जागा मालक कै. वाघ यांचे नातु रजनीश अभिजित वाघ यांनी मनपाला रितसर तक्रार केली असुन मनपाच्या नगर रचना विभागाने त्यांचं बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत अतिक्रमण काढून घेण्याबाबत 24 मार्च रोजी नोटीस बजावली आहे. मात्र आद्यपही या ठिकाणचे अतिक्रमण निघालेले नाही.नायब तहसिलदार ढगे यांनी अतिरिक्त जागा बळकावली व ताबा मारून सर्वसामान्य माणसाची जमीन लाटून पुन्हा मूळ मालकावर दबाव आणत असल्याचा आरोप शिवसेनेचे उपशहर प्रमुख दीपक कावळे पाटील यांनी जिल्हाअधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

मी मोठा अधिकारी आहे माझं कोणीच काही वाकड करू शकत नाही व उलट जागा मालकांच्या घरच्यांवरच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी वारंवार दिली जात असून व त्या पद्धतीने बळाचा वापर करून गुन्हे देखील दाखल केले आहेत .अशा ताबेखोर नायब तहसिलदारमुळे आपल्या संपूर्ण विभागाची बदनामी होत असुन त्यांच्यावर जमीन
बळकावणे, अतिक्रमण ताबा मारणे, अनधिकृत बांधकाम करणे प्रकरणी तात्काळ निलंबनाची कडक कारवाई करन्यात यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version