मुंबई दि.२ ऑक्टोबर :
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या (IPS) बसल्या ह्या दसऱ्यानंतर होणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती समोर येत आहे. राज्य सरकाने तीन दिवसापूर्वी 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार याबद्दल सर्वानाच उत्सुकता लागून आहे.
कोरोना काळामुळे दोन वर्ष बदल्यांचा बाबत निर्णय घेण्यास महाविकास आघाडी सरकारला वेळ लागला होता त्यानंतर मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून शिंदे फडवणीस सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा बदल्यांचा सिलसिला सुरू झाला आहे.आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे जे आयपीएस अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना आता उत्सुकता आहे की बदल्यांच्या आदेशाची.