Home Uncategorized उड्डाणपुलाच्या खालील पिलरवर अफजल खानाच्या वधाचे चित्र रेखाटवे – मनसेच्या सुमित वर्मा...

उड्डाणपुलाच्या खालील पिलरवर अफजल खानाच्या वधाचे चित्र रेखाटवे – मनसेच्या सुमित वर्मा यांची मागणी

अहमदनगर दि.७ जानेवारी

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या पिढीला समजण्यासाठी उड्डाणपुलाच्या खालील पिलरवर
छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवन प्रवास रेखाटला जात आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात स्वराज्य स्थापने साठी अनेक लढाया लढल्या अनेक पराक्रम केले त्यापैकी स्वराज्यावर चालून आलेला अफझल खानाचा वध आणि पुणे येथील शाहिस्तेखान खानची बोटे कापण्याचा इतिहास अजूनही चांगलाच चर्चित आहे.

स्वराज्य रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून अफझलखानाचा वध करण्याचा किंवा शाहिस्तेखान खानची बोटे छाटन्याया इतिहास येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी असल्याने तो इतिहास अहमदनगर शहरतील उड्डाणपुलाच्या खाली रेखाटण्यात यावा अशी मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित संतोष वर्मा यांनी केलीय तसेच बालपणी शिवाजी महाराजांनी गोरक्षक म्हणून कसायाला केलेल्या शिक्षे बद्दलची चित्रे का नाही असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केलाय या उड्डाणपुलाचे श्रेय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचा नक्कीच विचार करावा.असेही सुमित संतोष वर्मा यांनी सुनावले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version