Homeशहरपाणीपुरवठा केंद्र वसंत टेकडी येथील पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर...

पाणीपुरवठा केंद्र वसंत टेकडी येथील पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत 

advertisement

अहमदनगर दि४ जानेवारी

अहमदनगर, मंगळवार दि. ३-१-२०२० रोजी मध्यरात्री पासून अहमदनगर महानगरपालिकेच्या
शहर पाणीपुरवठा केंद्र वसंत टेकडीसह आर.टी.ओ/ सरोष पाण्याची टाकी येथील वीज पुरवठा बंद
झालेला होता. वीज पुरवठा सुरू करणेबाबत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी / अधिकारी यांना
महानगरपालिकेकडून वारंवार संपर्क करूनही त्यांचेकडून प्रतिसाद मिळत नव्हता तसेच त्यांचे वसंत
टेकडी येथील स्थानिक कार्यालयही बंद होते. वारंवार विनंती केल्यानंतर अखेर आज सकाळी ९.३०
वाजता वीज वितरण कंपनी कडून बंद पडलेला वीज पुरवठा सुरू झालेला आहे.

परंतु पाणी पुरवठा मुख्य केंद्र वसंत टेकडी व आर.टी.ओ/ सरोष पाण्याची टाकी येथील वीज
पुरवठा सलग ९ ते १० तास बंद राहिल्याने वसंत टेकडी येथील उपनगर भागासाठी पाणी वाटपा
करीताची उंच टाकी व शहराच्या मध्यवर्ती भागासाठी पाणीपुरवठा होत असलेली आर.टी.ओ/ व
सरोष उंच पाण्याच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. तसेच वसंत टेकडी येथून थेट विद्युत मोटरीद्वारे
पाणी पुरवठा होत असलेल्या निर्मलनगर, लक्ष्मीनगर, तपोवन रोड परिसर, सुर्यनगर, मुकुंदनगर
इ. उपनगर भागाकरीताच्या कार्यरत मोटरीद्वारे वीजपुरवठया अभावी होणारा पाणी उपसा बंद होता.
परिणामी आज बुधवार दि.४-१-२०२३ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास कोठला, मंगलगेट, झेडींगेट, दाळमंडई, रामचंद्रखुंट, काळुबागवान गल्ली, धर्ती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागासह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, टिव्ही सेंटर हडको, लाईट बिशप कॉलनी इ. परिसरात पाणी पुरवठा करता आलेली नाही, या भागातील पाणीपुरवठा हा गुरूवार दि. ५-१-२०२३ रोजी करण्यात येईल.


तसेच गुरूवार दि. ५-१-२०२३ रोजी रोटेशन नुसार पाणीवाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास
सिध्दार्थ नगर, सर्जेपुरा, तोफखाना, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगांव, चितळे रोड, खिस्त गल्ली,
आनंदीबाजार, कापडबाजार माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी परिसर इ. भागाचा पाणी
पुरवठा बंद राहणार असुन या भागास गुरूवार ऐवजी शुक्रवार दि. ६-१-२०२३ रोजी करण्यात येईल.

शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मंगळवार दि.३-१-२०२३ रोजी मध्यरात्रीपासून ०३ दिवस संप पुकारलेला असल्याने दरम्यान काळात खंडीत वीज पुरवठयाच्या नियमीत पाणी उपशावर व वितरण व्यवस्थेच्या टाक्या निर्धारीत वेळेत भरणेस विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी वीज वितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या संपामुळे वीज पुरवठयाबाबतची संभावी परिस्थिती विचारात घेता नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular