अहमदनगर दि.१६ ऑक्टोबर
रेशन दुकानावर गरजूंना स्वस्त दरात दिले जाणारे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जातेय त्या साठी एक मोठी साखळी अस्तित्वात असून ही साखळी तोडण्याचं काम पुरवठा विभागाकडे आहे मात्र अपुरे मनुष्यबळ आणि काळा बाजारात मधील विक्री करणाऱ्या टोळीचे मोठे साम्राज्य यामुळे खऱ्या लाभार्थींपर्यंत जाणारे धान्य हे इतर ठिकाणी विकले जात आहे.
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानासाठी आलेला गहू, तांदूळ, साखर, चना डाळ, मका, चना आदी मालाचे लाभार्थ्यांना वाटप न करता परस्पर खुल्या बाजारात विक्री करून याचा सर्व लाभ हा त्या टोळीच्या खिशात जात आहे. ही टोळी सध्या शहरातील दुकानदारांकडून धान्य घेऊन हे धान्य थेट काही ठिकाणी पशुखाद्य बनवण्यासाठी वापरले जाते तर काही ठिकाणी मोठमोठ्या पिठाच्या मिलमध्ये याची विक्री केली जाते विशेष म्हणजे ही टोळी साम-दाम दंड भेद वापरायला कमी करत नाही जे रेशन दुकानदार धान्य देण्यास नकार देतात त्यांच्या विरोधात तक्रारी अर्ज देऊन त्यांना जेरीस आणणे आणि अखेर धान्य देण्यास मान्य केल्यानंतर तक्रारी अर्ज मागे घेणे असे प्रकारही घडत आहेत.शहरातील एक दुकानदार या काळ्या बाजारावर गडगंज श्रीमंत झाला असून तो या काळ्या धंद्यांचा सम्राट झाला आहे.
पूर्वी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच रेशन धान्य दुकानातील धान्य असलेल्या गोण्यांची पलटी दुसऱ्या गोण्या मध्ये भरून ती विक्री होत असत मात्र आता थेट सरकारी शिक्के असलेले पोते विक्रीसाठी नेला जात आहे यावरून या टोळीची दहशत किती असेल हे समजून येते.
रेशन कार्ड प्रत्येकाच्या घरात असेल मात्र प्रत्येक माणूस हा रेशन आणण्यासाठी जात नाही ते कार्डधारक हेरून त्यांच्या नावाचे धान्य काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे समजतंय.
पोलीस आणि पुरवठा विभाग वेळोवेळी माहिती मिळाल्यानंतर काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करतच असतात मात्र कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याच्या नादात काही लोक गोरगरिबांच्या ताटातील अन्न हिसकावून बाहेर विकतात हे तेवढेच खरे आहे