अहमदनगर दि१९ सप्टेंबर:
‘वेदांत-फॉक्सकॉन’ (Vedanta-Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षाने सरकारवर टीकेची झोड उठविली आहे तर प्रकल्प जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) सांगत आहेत.या साऱ्या प्रकरणात एक गोष्ट खरी आहे की अनेक लोकांचा रोजगार यामुळे बुडाला आहे वेदांत कंपनी मुळे हजारो लोकांना रोजगार मिळू शकला असता मात्र आता यापेक्षा मोठी कंपनी महाराष्ट्रात आणू असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे आता अहमदनगर शहरातील एक्साइड या कंपनीत शनिवारपासून कामगारांनी काम बंद आंदोलन केल आहे. विशेष म्हणजे अहमदनगर शहरात या कंपनीने 2004 सालीच आपला प्रोजेक्ट बंद केला होता. मात्र पुन्हा अहमदनगर शहरातील एमआयडीसी मध्ये हा प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे.हजारो कामगार या कंपनीमध्ये कामावर आहेत. मात्र काही राजकीय कामगार संघटनांमुळे या ठिकाणी नेहमीच संघर्ष पाहायला मिळतो. कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणे आणि बंद पुकारणे हे योग्य असले तरी यामध्ये राजकीय पोळी भाजणार नाही याची दक्षता कामगारांनी घेणे गरजेचे आहे.
कामगार हा दिवसभर राबून महिन्याला काबाड कष्टाचा पगार घेत असतो. मात्र यांच्या अडून काही राजकीय लोक राजकारण करून याच कामगारांच्या पोटावर पाय देण्याचे काम करतात हे वेळोवेळी दिसून येतं मात्र गरीब कामगारांना आपल्या रोजी रोटीसाठी आणि त्यांच्या राजकीय ताकदीपुढे काहीच करू शकत नसल्याने नाईलाजाने का होईना या लोकांच्या पाठीमागे उभे राहावे लागते.
अहमदनगर शहरातील एमआयडीसी चा इतिहास हा फार काळवंडलेला आहे अहमदनगर शहरातील एमआयडीसी ही दिवसेंदिवस बकाल होत चालली आहे. अनेक मोठमोठे उद्योग हे अहमदनगर शहराच्या बाहेर गेले आहेत. तर एकही नवीन उद्योग अहमदनगर शहरातील एमआयडीसी मध्ये येण्यास तयार नाही कारण अहमदनगर शहरातील राजकारण आणि या राजकारणामधून होणाऱ्या कामगार संघटना आणि वर्चस्वाची लढाई यामुळे कंपनींना वेठीस धरले जाते. वर्गणीच्या, हप्त्याच्या आणि टेंडर मिळवण्याच्या स्पर्धेत थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली जाते. मध्यंतरीच्या काळात एका टेंडर साठी एका कामगार संघटनेचे नेत्याने थेट एका कंपनीच्या अधिकाराचं केबिन फोडल्याचे घटना ताजी आहे. मात्र अशा गुंडशाहीमुळे अहमदनगर शहरातून हळूहळू कंपन्या निघून जात आहे.त्यामुळे आता एमआयडीसी ची परिस्थिती अत्यंत खालवली असून हजारो कामगार बेरोजगार होत आहेत. याला कारणीभूत या ठिकाणी होत असलेलं खाणेरडे राजकारण आणि त्याला साथ देत असलेल्या नेत्यांमुळे निवडणुकीच्या काळात एमआयडीसी मध्ये मोठमोठे उद्योग आणून अशी घोषणा राज्यातून आलेले मोठमोठे नेते करत असतात प्रत्यक्ष अहमदनगर शहरात कोणत्याही नेत्यांनी मोठी कंपनी आणल्याचं उदाहरण दिसत नाही. उलट नगर मधील राजकारणीच आपल्या पंटरांना विविध कामगार संघटना स्थापन देण्यात मदत करतात आणि पुढे भविष्यात हे बगलबच्चे आपल्या फायद्यासाठी हजारो कामगारांचा नुकसान करतात.
मात्र याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे अहमदनगर शहर हे एक खेडं हे ब्रीद वाक्य होऊन गेल आहे. नगर शहरातील परिस्थिती अत्यंत भयानक असून एकही रस्ता व्यवस्थित नाही शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. गुंडागिरी करून प्लॉटवर ताबे मिळवणे बळजबरीने कमी पैसे देऊन घर खाली करून घेणे मुलींची छेडछाड अशा अनेक घटना शहरात झपाट्याने वाढत आहे. गुंडगिरीला पाठबळ कोणाकडून मिळते या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे नगरकरांनी जागे होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात नगर हे फक्त पेन्शन धारकांचं शहर म्हणून ओळख होऊ शकते.