अहमदनगर दि.५ जानेवारी
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून व्हायरल कॉल ची मालिका सुरू झाली आहे. अकोले ,नेवासा श्रीरामपूर ,राहुरी नगर शहरातून विविध कॉल व्हायरल झाले आणि त्यावर काही ठिकाणी कारवाई झालेली आहे.
मात्र आता श्रीगोंदा तालुक्यात एक कॉल व्हायरल झाला होता काही वेळाने तो पुन्हा एकदा डिलीट झाला खरा पण या व्हायरल कॉलने एकच खळबळ उडवून दिली फोन वरून बोलणारी व्यक्ती पत्रकार असल्याचं सांगत त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला कॉल केल्याचं दिसून येतंय फोन वरून बोलणाऱ्या व्यक्तीने थेट पोलिस कर्मचाऱ्याला कॉल करून फुकट जेवण्याची साठी एखाद्या हॉटेलला सोय करा असं फर्मान सोडलं तसेच तुमच्या हद्दीत चाललेल्या अवैध धंद्यांना बाबत मला माहिती आहे असाही सांगण्यास तो फोन वर बोलणार व्यक्ती विसरला नाही.मात्र समोरच्याने त्याला दादा न देता चांगलंच सुनावत कॉल कट केला.त्या मुळे पत्रकार म्हणून फोन वर बोलणाऱ्याला जेवण तर मिळालेच नाही मात्र कॉल व्हायरल झाल्याने चांगलीच तारांबळ उडाली होती.
काही सोशल मीडिया ग्रुप वर हा कॉल व्हायरल झाला होता मात्र काही काळाने पुन्हा डिलीट करण्यात आला पण या मधून सत्य परिस्थिती समोर अली असून पत्रकारितेला ‘प’ पण कळत नसलेले काही लोक पत्रकारितेला बदनाम करत आहेत.
पोलिस प्रशासन असेल अथवा विविध सरकारी कार्यालयात अशा तोतया पत्रकारांचे पेव सुटले आहे सध्या सोशल मीडियावर एखादा ग्रुप स्थापन करून त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना सामील करून घेऊन त्यांची वाहवा करत कोणत्याही वृत्तपत्र अथवा वृत्तवाहिनीसाठी काम न करता बातम्या कॉपी पेस्ट करत आपण पत्रकार असल्याचं भासवत अनेक तोतया पत्रकारांचे उद्योग सुरू आहेत त्यामुळेच खऱ्या काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक वेळा काही गोष्टींचा सामना करावा लागतो.