अहमदनगर दि.१२ जानेवारी
अहमदनगर शहरातील अनेक शिव प्रेमींची मागणी होती की शहरात स्वराज रक्षक संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा यासाठी प्रोफेसर कॉलनी चौकातील जागा निश्चिती करण्यात आली होती. मात्र २००७ पासून हा विषय रेंगाळला आहे.तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी एका रात्री चौथरा उभारून स्वराज रक्षक संभाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र पोलिसांनी तातडीने हा पुतळा हटवला होता.
या चौकात पुतळा उभारण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती त्या मुळे पुतळा तयार असूनही मनपाला पुतळा उभा करण्यात अडथळा येत होता. या बाबत महानगर पालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या प्रोफेसर कॉलनी चौकातील शॉपिंग सेंटरच्या समोर मनपाच्या मालकीच्या जागेत हा पुतळा उभारण्यात येणार आहे. या बाबत महापालिका प्रशासनाने पुतळ्याच्या परवानगी साठी जिल्हापोलिस प्रमुखांकडे परवानगी साठी प्रस्ताव पाठवला आहे .
मात्र २००७ पासून मनपा प्रशासनाने या कामाची फाईल या टेबल वरून त्या टेबलवर फिरवत ठेवली त्या मुळे महापुरुधांचे पुतळे उभारण्यात अडथळा निर्माण होत आहे.
या प्रश्नावर बुधवारी झालेल्या महासभेत नगरसेवक कुमार वाकळे यांनी आक्रमक होत याप्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. जर महापालिका प्रशासनाने सर्व कायदेशीर पूर्तता करत महिन्याभरात स्वराज रक्षक संभाजी महाराजांचा पुतळा उभारला नाही तर महिनाभरात आम्ही पुतळे उभा करू असा इशारा दिला आहे.