Home राजकारण भेंडे, , कुकाणा, घोगरगावसह १४ गावांच्या पाणी योजनेच्या दुरुस्ती व कामासाठी २८...

भेंडे, , कुकाणा, घोगरगावसह १४ गावांच्या पाणी योजनेच्या दुरुस्ती व कामासाठी २८ कोटी मंजूर; मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांना यश

सोनई -प्रतिनिधी:- आदित्य सुकाळकर

भेंडा, घोगरगाव १६ गावांच्या पाणी योजनेच्या दुरुस्ती व वाढीव कामासाठी २८ कोटी ४६ लाखाचा निधी नेवासा तालुक्यासाठी मिळाला . हा निधी जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत मिळाला . या कामाची प्रशासकीय मंजुरी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मंत्री शंकरराव गडाख यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता.

भेंडे बुद्रुक, भेंडे खुर्द, कुकाणे, चिलेखनवाडी,अंतरवली, तरवडी या योजनेसाठी १२ कोटी ४ लाखांचा तसेच बेलपिंपळगाव, बेलपांढरी, जैनपूर , बोधेगाव, घोगरगाव, भालगाव, बोरगाव, उस्थळ खालसा, सुरेगाव गंगा, बहिरवाडी, धामोरी यासाठी १६ कोटी ४२ लाखांचा कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली.

जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक तत्यानुसार पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती करिता योजनेच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम लोकवर्गणीच्या स्वरूपात ग्रामपंचायतीकडे ठेवणे आवश्यक राहील. ही रक्कम जमा करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेची राहील, असे शासन निर्णयात नमूद केले. पूर्वीच्या सर्व योजनांत दिवसाला प्रत्येक माणसाला ४० लिटर पाणी देण्याची तरतूद होती.आता मात्र या जल जीवन मिशन कार्यक्रम योजनेत प्रत्येक दिवसाला माणसी ५५ लिटर प्रत्येक पाणी देण्याची तरतूद करण्यात आली.

या दोन्ही योजना १९९८ सालच्या होत्या व मुख्य गावसाठीच होत्या परंतु आता या १७ गावात तर पाणी मिळेल पण वाड्या वस्त्यांवर सुद्धा पाणी पोहचणार आहे. यात जुन्या पाण्याच्या टाक्या दुरुस्ती, लिकेजेस काढणे , वाड्या वस्त्यांवर नवीन पाईप लाइन करणे असे अनेक कामे केले जाणार आहे.पुढील सर्व प्रक्रियेसाठी ६ महिने लागणार आहे .

वाड्या – वस्त्यापर्यंत पाणी पोहोचले जावे कोणीही वंचित राहू नये तसेच या योजनेत पशुधनाला शुद्ध पाणी मिळावे याचा प्राधान्याने विचार केला जावा, अशी मागणी मंत्री शंकराव गडाख यांनी केली होती, ती मागणी ही मंजूर करण्यात आली आहे

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version