Home राजकारण शिवसेनेचा अपमान सहन करत कुठपर्यंत महाविकास आघाडीच्या जयजकाराच्या घोषणा द्यायच्या माजी आमदार...

शिवसेनेचा अपमान सहन करत कुठपर्यंत महाविकास आघाडीच्या जयजकाराच्या घोषणा द्यायच्या माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर निष्ठावान शिवसैनिक अस्वस्थ सोशल मीडियाच्या मध्यमातून शिवसैनिक करतायेत भावना व्यक्त

अहमदनगर दि५ मार्च

अहमदनगर शहरात सध्या  शिवसेना नगर या फेसबुक पेजची चर्चा चांगलीच सुरू आहे कारण या फेसबुक पेजवर नगर शहरातील शिवसेनेत सध्या अंतर्गत कलह कसा सुरु आहे याबाबत पोस्ट करण्यात आले आहेत.

“अनिल भैय्या राठोड किंवा
राठोड परिवार यांना जर
बाजूला केलं तर नगर शहरात
किंवा शिवसेनेत तुमची लायकी
काय आहे हे तपासणे गरजेचे…
#आमदारकीचे स्वप्न”

२४ तास जनतेसाठी कार्यरत असलेला मोबाईल आमदार म्हणून अहमदनगर शहरातील नव्हे जिल्ह्यातील नागरीकांना परिचित असलेले माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांचे अचानकपणे निधन झाल्यानंतर अनिलभैय्या राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण नगर शहरात अनिल राठोड आणि शिवसेना आणि नगरचे नागरिक यांचा मेळ एवढा घट्ट झाला होता की पाच वेळा जेव्हा स्व.अनिल राठोड हे निवडणुकीमध्ये निवडून आले होते तेव्हा दरवर्षी विकासाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका होत असताना निवडणुकीच्या विजयात त्यांचे मताधिक्य वाढत असल्याचं संपूर्ण नगर शहराने पाहिले आहे.

महानगरपालिका निवडणूक असो अथवा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू झाल्या की आमदार अनिल राठोड यांना प्रचारासाठी बोलवल्या शिवाय एकही निवडणूक झालेली नाही. अहमदनगर महानगरपालिकेच्या पहिला महापौर म्हणून एका शेतकरी कुटुंबातील तरुणाला बसून आमदार अनिल राठोड यांनी शिवसेना सर्वसामान्य लोकांची आहे ही ओळख दाखवून दिली होती.

शिवसेनेत आलेल्या अनेक सामान्य लोकांना नगरसेवकापासून ते महापौर पदापर्यंत नेण्याचं काम शिवसेनेने अर्थातच अनिल राठोड यांच्या करिश्माने झाल्याचा नगरकरांनी पाहिला होते मात्र अनिलभैय्या राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेमध्ये उघड उघड दुफळी झाल्याचं चित्र मधल्या काळात निर्माण झालं होतं ही दुफळी मिटवण्याचे काम शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केलेही होते मात्र त्या प्रयत्नाला अद्यापही यश मिळाले नाही. त्यामुळे आता जुने निष्ठावंत शिवसैनिक सध्याच्या शिवसेनेच्या कामावर नाराज असून शिवसेनेतील काही लोक राष्ट्रवादी बरोबर राहून शिवसेनेचा अपमान करत असल्याच्या भावना नगर शिवसेनेच्या फेसबुक पोस्टवरून व्यक्त होत आहे.

नगर शहराची जबाबदारी ज्या संपर्क नेत्यांवर आहेत ते सुद्धा या दुफळी कडे लक्ष न देता राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन गप्पा मारत असल्याची टीका फेसबुक पोस्ट द्वारे करण्यात आली आहे तसेच राज्याचे शिवसेनेचे मंत्री शंकराव गडाख यांनीसुद्धा नगर शहरातील शिवसेनेतील दुफळी बाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचाही या पोस्ट मधून सांगण्यात आले आहे.

काही लोकांना आमदारकीचे स्वप्न पडत असून
स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या समर्थकांना बाजूला सारून हे स्वप्न पाहू शकत नाही अशा आशयाच्या पोस्टही सध्या व्हायरल होत आहेत.

अनिल राठोड यांच्या कारकिर्दीत महानगरपालिकेत शिवसेनेचे महापौर उपमहापौर पद तसेच स्थायी समिती पद शिवसेनेकडे घेण्याचा इतिहास स्व.अनिल राठोड यांनी केला होता मात्र आता सध्या शिवसेना-भाजप काँग्रेस यापकी फक्त राष्ट्रवादी हा पक्ष एकसंघ असून बाकीचे सर्व पक्ष राष्ट्रवादी चालवत असल्याची टीका या पोस्ट द्वारे करण्यात आली आहे.

त्यामुळे महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्थान मिळत नसल्याने फक्त महाविकास आघाडीच्या नावाने जयजयकार करत शिवसेनेचा अपमान सहन करण्याची वेळ आली असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार असल्याने मुंबईतील िवसेनेचे नेते नगर शिवसेनेच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

एकंदर अहमदनगर शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांची घुसमट होत असल्याचे या सर्व फेसबुक पोस्टवरून दिसून येत असून  आता शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढवायची असले तर सर्व मतभेद दूर करून शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे तरच पुढील काळात पुन्हा एकदा ‘आवाज कोणाचा शिवसेनेचा‘ ही घोषणा नागरकरांना पुन्हा ऐकू येईल.

नगर शहरात सध्या या फेसबूक पोस्ट बाबत चांगली चर्चा होत असून यामुळे आगामी काळात राजकीय पक्षांचे मनसुबे कसे असतील हे लक्षात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version