Homeशहरकुणाल भंडारी हल्ला प्रकरण.. आरोपी अफजल शेख याचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठातही...

कुणाल भंडारी हल्ला प्रकरण.. आरोपी अफजल शेख याचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठातही फेटाळला..

advertisement

अहमदनगर दि.२० जुलै
बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी व त्यांचा मित्र, हे दोघे तारकपूर येथून रामवाडी कडे जात असताना वीस ते पंचवीस जणांनी त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती.


रामवाडी येथील दोन गटात हाणामारी
सुरू होती. त्यावेळी कुणाल भंडारी व डापसे
दोघे तेथून जात असताना गर्दी कशामुळे जमली
हे पाहण्यासाठी ते दोघे थांबले होते. दरम्यान त्या
जमावातील काहींनी कुणाल भंडारी यांच्याकडे येत
मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने
खिशातील हत्यार काढून कुणाल भंडारी याच्या
पोटात खूपसण्याचा प्रयत्न केला. त्यास भंडारी
याने प्रतिकार केला. त्यात भंडारी हे जखमी झाले होते. उपचारादरम्यान भंडारी येणे दिलेल्या जबाब वरून पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर हा हल्ला कोणाच्यातरी सांगण्यावरून झाला असल्याची तक्रार कुणाल भंडारी यांनी दिल्यानंतर या प्रकरणात अफजल शेख याचे नाव आले होते. त्याच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेव्हापासून तो फरार आहे. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी अहमदनगर जिल्हा न्यायालयात अफजल शेख याने जामीन अर्ज दाखल केला होता तो जामीन अर्ज फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होत. मात्र तिथेही सुनावणी झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने अफजल शेख याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याप्रकरणी कुणाल भंडारी यांच्यावतीने औरंगाबाद येथील विधीज्ञ आशिष जाधवर यांनी काम पाहिले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular