मुंबई दिनांक २३ जानेवारी
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये 26 जानेवारी पासून नवीन जिल्हे अस्तित्वात येणार आहेत अशी एक पोस्ट फिरत होती या मध्ये भुसवळ, उदगीर अंबेजोगाई,मालेगाव,कळवण, किनवट, मीरा-भाईंदर,कल्याण, माणगाव, खानदेश,बारामती, पुसद, जव्हार, अचलपूर, साकोली, मंडणगड, शिर्डी, महाड ,संगमनेर,श्रीरामपूर, अहेरी असे नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार असून त्याची कारवाई 26 जानेवारी पासून होणार असल्याची पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होती मात्र आता यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrshekhar bawankule ) यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.