Home क्राईम डोशातील चटणी खराब असल्याच्या कारणावरून बेदम मारहाण वाडीलांसह दोन मुलांना दोन वर्षे...

डोशातील चटणी खराब असल्याच्या कारणावरून बेदम मारहाण वाडीलांसह दोन मुलांना दोन वर्षे सश्रम कारावास

अहमदनगर दि२७ एप्रिल
दोन मित्रांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांना भादंवि कलम ३२६ प्रमाणे तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि भादंवि कलम ३२४ प्रमाणे दोन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपये
दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. किशोर संजय भागानगरे (वय ३३), अक्षय संजय भागानगरे (वय २८) व संजय दत्तात्रय भागानगरे (वय५६, सर्व रा. कुंभारगल्ली, नालेगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांनी हा निकाल दिला. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी कामकाज पाहिले.तर मूळ फिर्यादीतर्फे अॅड. सुहास टोणे व पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार एम. ए.थोरात यांनी सहकार्य केले.


ही घटना ८ सप्टेंबर, २०१७ रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली होती. अतुल सुभाष वाघचौरे व त्यांचा मित्र धिरज भगवान रोहोकले असे दोघेजण चौपाटी कारंजा येथे सिध्देश्वर उडपी सेंटर या गाडीवर स्पंज डोसा खाण्याकरिता गेले होते. त्यांनी अक्षय भागानगरे यास खाण्यासाठी दोन स्पंज डोसे मागितले असता त्याने त्यांना स्पंज डोसे दिले. अतुल व त्याचा मित्र तो डोसा खात असताना त्यांना असे जाणवले की, बटाट्याची चटणी विटली असुन त्यामुळे डोसा खराब लागत आहे. त्यामुळे अतुलने अक्षयला म्हटले,’डोशातील चटणी खराब झाली असून तिला वास लागला आहे.’ त्यामुळे डोसा खाण्यास खराब लागत आहे. हवं तर तू खाऊन बघ’. तेव्हा अक्षय म्हणाला, ‘मी काय तुझा उष्टा डोसा खाऊ काय?’ अतुलच्या बोलण्याचा अक्षयला राग आल्याने अक्षयने अतुल व त्याचा मित्र धिरजला शिवीगाळ केली.

तेव्हा किशोर भागानगरे याने हातातील लोखंडी कवचा घेऊन अतुलच्या डोक्यात मारला. संजय भागानगरे याने लाकडी दांडक्याने अतुलच्या पाठीत मारहाण केली. तसेच अक्षय याने त्याच्या नाष्टा सेंटरच्या गाडीमध्ये ठेवलेली तलवार काढली व धिरजच्या डोक्यावर तलवारीचा वार केला. मारहाणीत जखमी झालेले अतुल व धिरज यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना अतुलचा जबाब पोलिसांनी नोंदविला.

आरोपींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर
आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version